आपल्यातील गुण ओळखून त्यांचा ईश्वराच्या सेवेत योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे !

देवाने प्रत्येकाला काहीतरी चांगले गुण दिलेले असतात. स्वतःमधील त्या दैवी गुणांना ओळखून त्यांचे संवर्धन करायला हवे. या गुणांचा देवाची सेवा, समष्टी सेवा आणि गुरुकार्य करणे यांसाठी लाभ करून घेता आला पाहिजे, तरच ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या या गुणांचे सार्थक झाल्यासारखे होईल. गुणसंवर्धनाने आपल्यातील साधनेचा उत्साह वाढल्याने मन अधिकाधिक सकारात्मक बनते. मनोबळ वाढले की, सेवाही चांगली अन् भावपूर्ण होऊ लागते आणि मगच साधनेतील खरा आनंद मिळू लागतो.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, तिरुवण्णमलई, तमिळनाडू. (१८.४.२०२०)

Leave a Comment