हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना आवश्यक !

‘नामजपाने दैवी शक्तींचे साहाय्य लाभते. अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; पण त्याचसमवेत तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामजपामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे. नामजपाने प्रत्येक कर्म अकर्म होते, म्हणजे त्या कर्माचे पाप-पुण्य लागत नाही. यावरून ‘हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेचे कार्य करतांना नामजप करणे किती आवश्यक आहे’, हे लक्षात येईल.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

Leave a Comment