मन आणि बुद्धी यांच्या एकत्रित संगमाने केलेली सेवा ‘परिपूर्ण सेवा’ होऊन आनंद मिळताे

‘आपण तत्त्वरूपाने जे शिकलो, ते आता कृतीत आणणे आवश्यक आहे. केवळ शिकण्यातून मन सकारात्मक बनते; परंतु शिकलेले प्रत्यक्ष कृतीत आणले, तर बुद्धीही मनासोबत सेवा करू लागते. ‘मन आणि बुद्धी’ यांच्या एकत्रित संगमाने निर्माण झालेली ऊर्जा तुम्हाला सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळवून देते. यालाच ‘परिपूर्ण सेवा करणे’, असे म्हणतात. परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार अंगी बाणवला असता ‘मन आणि बुद्धी’ अगदी चांगल्या समजूतदार मित्रांप्रमाणे हातात हात घालूून सेवा करू लागतात. यामुळे आपल्याला मिळणार्‍या सेवेतील आनंदाचे प्रमाण वाढते. सेवेतील आनंद वाढला की, देव तुमच्या अधिकाधिक जवळ येऊ लागतो.’

-श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment