हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

‘श्रीराम स्वतः ईश्‍वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्‍वरी राज्याची स्थापना ईश्‍वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो. ‘आता हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्‍वराने करावी किंवा संतांकडून करवून घ्यावी’, यासाठी आपण त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे.’

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्‍वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

Leave a Comment