उन्नतांनी स्थुलातील कार्य सहसा न करण्याची कारणे

राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अतिशय गंभीर असूनही संत त्या संदर्भात काही का करत नाहीत ?, असा प्रश्‍न काही जणांना पडतो. त्याचे उत्तर येथे दिले आहे.

१. कालमाहात्म्य जाणणे : काही केले नाही, तरी २०२३ या वर्षी हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे, हे ज्ञात असल्याने हल्लीच्या उन्नतांना त्या संदर्भात काही करावेसे वाटत नाही.

२. सर्व माया असल्याचे जाणणे : हे जाणल्यामुळे काही करावे, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही.

३. ब्रह्मानंदी असणे : एखाद्याला एखाद्या कृतीतून आनंद मिळणार असेल, तर तो ती कृती करतो. एखाद्याला आनंद आधीपासूनच असला, तर तो ती कृती कशाला करील ? उन्नत (संत) ब्रह्मानंदात असल्याने त्यांच्या मनात काही करावे, असा विचार येत नाही.

श्रीकृष्णाला वरील सर्व सूत्रे लागू पडत असूनही त्याने सर्वकाही केले. यावरून तो मायेत राहूनही स्वतःची सच्चिदानंद अवस्था न गमावता सर्वकाही करू शकणारा एकमेवाद्वितीय असल्याचे लक्षात आले.

– (प.पू) डॉ. आठवले

Leave a Comment