आध्यात्मिक उपाय
वाईट शक्तींच्या त्रासामुळे सनातनला अन् संपूर्ण मानवजातीला झालेला महत्त्वपूर्ण लाभ ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सनातनचे समष्टी स्तरावरील कार्य चालू झाल्यावर वाईट शक्तींनी त्याला विरोध म्हणून विविध स्तरांवर आणि विविध माध्यमांतून त्रास देण्यास आरंभ केला. या त्रासांमुळे सनातनला अनेक संतांकडून वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी करावयाचे विविध उपाय शिकणे शक्य होत आहे. त्रासाच्या निवारणासाठी विविध उपचारपद्धती शोधून काढता आल्या आणि काळानुसार सनातनला त्यांवरही विपुल प्रमाणात संशोधन करता आले. सध्याच्या काळात महर्षींच्या माध्यमातूनही विविध उपचारपद्धती कळत आहेत. साधकांना काही वर्षे हे त्रास सहन करावे लागले असले, तरी त्यातून पुढील अनेक पिढ्यांसाठी या उपायपद्धती सिद्ध झाल्या आहेत.’
सध्याच्या कलियुगात एकंदरित समाज धर्माचरणापासून विन्मुख झाल्याने आसुरी शक्तींनी उच्छाद मांडला आहे. आपण भौतिक साधनांनी वा अन्य मार्गांनी आनंदी व्हायचा प्रयत्न केला, तरी आसुरी शक्तींच्या त्रासांमुळे आनंदी होऊ शकत नाही. मग हा त्रास दूर होण्यासाठी नियमित कोणते नामजप आदी आध्यात्मिक उपाय आणि साधना करावी ? अतृप्त पूर्वजांमुळे होणार्या बुद्धीअगम्य त्रासांसंबंधी काय करावे ?, तसेच वास्तूदोष दूर होण्यासाठी अत्यल्प खर्चात वास्तूशुद्धी आणि प्रवास आनंददायी होण्यासाठी वाहनशुद्धी कशी करावी ? यांसारख्या सूत्रांचे विवेचन या सदरात केले आहे.
काळानुसार कोणते नामजप किती वेळ करावेत ?
‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते. तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धिलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.