अनुभव व अनुभूतीतील फरक
पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी या स्थूल इंद्रियांद्वारे जीवाला येणार्या संवेदनांना अनुभव म्हणतात. याला ‘स्थूलातील कळणे’ असे म्हणतात. उदबत्ती लावलेली असतांना नाकाद्वारे तिचा गंध येणे याला अनुभव म्हणतात, तर उदबत्ती लावलेली नसतांना नाकाच्या वापराशिवाय गंध येणे, याला अनुभूती म्हणतात.
अनुभूतींमुळे आपण योग्य साधना करीत आहोत आणि आपली अध्यात्मात प्रगती होत आहे, याची साधकाला खात्री पटते. एखाद्या साधनामार्गाने साधना करीत असता सलग तीन वर्षे ती साधना करूनही एकही अनुभूती न आल्यास आपला साधनामार्ग चुकीचा तर नाही ना, याची उन्नतांना विचारून खात्री करून घ्यावी.
एखाद्याला आलेली एक विशिष्ट अनुभूती दुसर्याला बहुधा तशीच्या तशी न येणे कोणत्या तर्हेच्या अनुभूतीमुळे कोणाची श्रद्धा वाढायला मदत होईल, हे प्रत्येकात निरनिराळे असल्यामुळे, तसेच प्रत्येकाची प्रकृती आणि पातळी निरनिराळी असल्याने प्रत्येकाला निरनिराळ्या तर्हेच्या अनुभूती येतात, उदा. कोणाला सूक्ष्म गंधाची येईल, तर कोणाला सूक्ष्म दर्शनाची. थोडक्यात म्हणजे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या अनुभूती’ असे आहे.
देवता आणि संत यांविषयी आलेल्या अनुभूती


