करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी
करवीर (कोल्हापूर) हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. श्री महालक्ष्मीदेवीचे हे स्थान आजही जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. ‘अंबाबाई’ या नावाने सुपरिचित असलेल्या या देवीचे हे स्थान ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते.