व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे सर्वनाशाकडे वाटचाल !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वेच्छा. जितके व्यक्तीस्वातंत्र्य अधिक तितका व्यक्तीचा अहंकार अधिक असतो आणि तितकी ती व्यक्ती प्रथम परेच्छा आणि नंतर ईश्‍वरेच्छा यांपासून अधिकाधिक दूर जाते आणि दुःखी होते. – डॉ. आठवले (४.४.२०१४)

नामजप लिहून खिशात ठेवा

प्रसारात असलेल्या साधकांना बर्‍याचदा नामजप करण्यास वेळ मिळत नाही. अशा वेळी त्यांनी नामजप लिहिलेला कागद खिशात आणि साधिकांनी पर्समध्ये ठेवावा. – डॉ. आठवले (२१.२.२०१४)

बुद्धीप्रामाण्यवादी आणि पाश्‍चात्त्य

बुद्धीप्रामाण्यवादी आपल्याला ज्ञात आहे, तेवढेच ज्ञान समजतात आणि जिज्ञासा नसल्यामुळे इतर गोष्टी नाकारतात. याउलट पाश्‍चात्त्य जिज्ञासा असल्यामुळे पुढे शिकत जातात, नवीन शोध लावतात ! – डॉ. आठवले (२१.३.२०१४)

देवघरातील प्रत्येक देवतेला निराळा नमस्कार करा !

घरी एखाद्याने पूजा केली की, घरातील इतर देवघरापुढे उभे राहून सर्व देवांना मिळून एक नमस्कार करतात. याऐवजी त्यांनी प्रत्येक देवतेच्या चित्राकडे किंवा मूर्तीकडे पाहून तिला तिचे नाव घेऊन नमस्कार केल्यास नमस्काराचा, साधनेचा अवधी थोडा वाढतो, तसेच त्यामुळे प्रत्येक देवतेबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागते. – डॉ. आठवले (२१.३.२०१४)

हिंदूंनी धर्माचरण न केल्यास त्यांना इतर पंथियांपेक्षा (धर्मियांपेक्षा) अधिक शिक्षा भोगावी लागणे !

हिंदूंनी धर्माचरण केले नाही, साधना केली नाही, तर त्यांना इतर पंथियांपेक्षा (धर्मियांपेक्षा) अधिक शिक्षा भोगावी लागते; कारण खरा धर्म ज्ञात असूनही त्यांनी त्याचे पालन केलेले नसते. इतर पंथियांना धर्म म्हणजे काय ? हेच ज्ञात नसल्याने त्यांच्याकडून अज्ञानापोटी ज्या चुका होतात, त्यासाठी त्यांना हिंदूंपेक्षा अल्प शिक्षा भोगावी लागते. देशातील नियम ज्ञात असूनही त्याचे पालन न केल्यास … Read more

भाव असला, तरी अहंभाव असू शकतो !

हल्लीच एकजण भेटायला आले होते. त्यांच्या चेहर्‍यावर भाव दिसत होता आणि त्यांच्या डोळ्यांत भावाश्रूही होते. ते बोलतांना त्यांची साधना, त्यांचे कार्य, त्यांना आलेल्या अनुभूती इत्यादींविषयी ते बोलायला लागल्यावर त्यांच्यात अहं असल्याचे जाणवले. नंतर हे लक्षात आले की, एखाद्यात भाव असला, तरी अहंभावही असू शकतो ! हे आयुष्यात पाहिलेले पहिलेच उदाहरण आहे. – प.पू. डॉ. जयंत … Read more

समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पुढे जागतिक महायुद्धही होऊन कोट्यवधी मानव मरणार आहेत. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे … Read more

साधकांनो, उपाय गांभीर्याने करा !

माझा महामृत्यूयोग, साधकांना होणारे त्रास, हिंदु राष्ट्राची स्थापना यांसंदर्भात विविध संतांनी सांगितलेले सर्व उपाय मी करतो. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष ८, कलियुग वर्ष ५११५ (१७.६.२०१३)

सांप्रदायिक साधनेने जलद प्रगती न होण्याचे कारण

व्हिटामिन ए, बी, सी, डी यांपैकी, तसेच लोह, कॅल्शियम इत्यादी धातूंपैकी जे कमी असेल, ते घ्यायला आधुनिक वैद्य (डॉक्टर) सांगतात. तसेच ज्या देवतेचे तत्त्व कमी असेल किंवा ज्या साधनामार्गाने साधना करणे आवश्यक असेल, त्यानुसार उपासना करायची असते. हे ज्ञात नसल्याने सांप्रदायिक साधना करणारे सर्वजण एकच उपासना करतात. असे करणे हे एखाद्या आधुनिक वैद्यांनी सर्व रुग्णांना … Read more