कुठे स्त्रियांना आधार वाटणारा ब्रह्मचारी डाकू जोगीदास, तर कुठे हल्लीचे राज्यकर्ते !

भूजमध्ये जोगीदास नावाच्या डाकूचा खूप दबदबा होता. भूजचा राजाही त्याला घाबरत असे. डाकू असूनही त्याने ब्रह्मचर्य व्रत घेतले होते. एका रात्री एक कामातूर युवती जोगीदासकडे आली. जोगीदास तिच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘माते परत जा’. एकदा घोड्यावर बसून गावात फेरफटका मारत असतांना सकाळी शेतात १८ वर्षांची एक सुंदर युवती एकटीच काम करत होती. जोगीदासने विचारले, … Read more

देहासक्ती नको !

देह सांडावा ना मांडावा । येणे परमार्थचि साधावा ॥ सांडोनिया देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥ – एकनाथी भागवत २०.१४७ अर्थ : देह सोडून देऊ नये आणि त्याचे लाडही करू नयेत. देहाभिमान सोडून साधना करून परमार्थ साधावा. त्याने ब्रह्मरूप झाल्याचे समाधान मिळते. एकनाथ महाराजांनी याचे एक उदाहरण दिले आहे. पक्षी वृक्षावर घरटे करून रहातो. निर्दय मनुष्य … Read more

अपसमज होण्याची कारणे

१. आपल्यावर आलेले दुःख किंवा संकट यांचे आपण कारण नसून दोष दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, दैवाचा आहे, असे समजणे २. मी कोणाचाही गुलाम नाही, अशा अपसमजुतीत सतत दुसऱ्याची गुलामगिरी पत्करणे ३. आपल्या अंगावर यायला नको; म्हणून नेहमी संदिग्ध भाषेत बोलणे ४. आपण कोणाचेही वाईट केले नाही; म्हणून माझे कोणी वाईट करणार नाही, असे समजणे ५. माझे … Read more

देव, मानव आणि राक्षस यांना भगवंताने सांगितलेली साधना

एकदा देव, मानव आणि राक्षस भगवंताकडे गेले आणि त्यांनी विचारले, ‘आम्ही कोणती साधना करावी की, ज्यामुळे आमचे कल्याण होईल ?’ भगवंताने सर्वांना ‘द’ हा मंत्र दिला. त्याचा अर्थ त्यांना कळेना. तेव्हा भगवान म्हणाला, ‘देवांनी ‘द’ म्हणजे ‘दमन’ म्हणजे इंद्रियनिग्रह करावा; कारण ते सतत उच्च लोकांतील सुखोपभोगात रममाण असतात. मानवांनी ‘द’ म्हणजे ‘दान’ करावे; कारण मानव … Read more

लक्ष्मी अणि सरस्वती एकत्र नांदू शकत नाहीत, असे का म्हटले जाते ?

लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्य यांची देवता आहे, तर सरस्वती ही विद्येची देवता आहे. आत्मज्ञान येण्यासाठी भौतिक सुखाचे वैराग्य येणे आवश्यक आहे. व्यक्तीकडे जेवढी जास्त संपत्ती आणि भौतिक सुखे असतील, तेवढी त्याला आसक्ती जास्त असते. जेवढी आसक्ती जास्त तेवढी आत्मज्ञान मिळण्याची शक्यता अल्प असते. येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ‘सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण धनाढ्य … Read more

दया

१. व्याख्या परे वा बन्धुवर्गे वा मित्रे द्वेष्टरि वा तथा । आपन्ने रक्षितव्यं तु दयैषा परिकीर्तिता ॥ – अत्रिसंहिता अर्थ : आपले भाऊबंध किंवा ओळख नसलेले, मित्र किंवा शत्रू किंवा आपला मत्सर किंवा द्वेष करणाऱ्यांवर आपत्ती आल्यास त्यांचे रक्षण करून त्यांना संकट आणि दुःख यांपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या मनोवृत्तीला ‘दया’ म्हणतात. भेद न करणे … Read more

कुटुंबपद्धती नसण्याने होणारे तोटे

अ. स्त्री-पुरुषांना कायद्याने समान हक्क देण्याने कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांचा विध्वंस ! स्त्री आणि पुरुष यांच्यातील अंतर मिटवण्याचा सहेतुक प्रयत्न झाला, तर त्याचा परिणाम दुःख आणि व्याधीत होणे अपरिहार्य आहे. सर्वच क्षेत्रांत स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क देण्यासंबंधीचा आग्रह धरण्याने आणि तसे कायदे करण्याने कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचाही विध्वंस होईल. आ. स्त्रीला पुरुषी … Read more

विज्ञानाच्या निकषावर सर्व पडताळून पहाण्यास सांगणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, या प्रश्‍नाचे उत्तर द्या !

बुद्धीप्रामाण्यवादी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषावर पडताळून पहाण्यास सांगतात. त्यांना स्वप्न पडताळून पहाण्यास सांगितले, तर ते काय सिद्ध करून दाखवतील ? साध्या स्वप्नाचे विज्ञानाच्या दृष्टीने विश्‍लेषण करता न येणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अनुभूतींचे काय विश्‍लेषण करणार ? – डॉ. आठवले (२१.१.२०१४)

भगवत्कथा ऐकण्यास जाण्याचे लाभ

१. कर्मयोग : कथेसाठी जाणे आणि येणे २. भक्तीयोग : श्रद्धा वाढणे ३. ज्ञानयोग : कथेचा सारांश समजणे प्रवचनाचे वैशिष्ट्य : प्रवचनकार श्रम करतो आणि फळ श्रोत्यांना मिळते ! पुढच्या जन्मी देवाण-घेवाण फिटण्याचे उदाहरण एक मुलगा मूठ मूठ माती घेऊन एका सापावर टाकत होता. सापाने फणा खाली घातला. तितक्यात दुसऱ्या एका माणसाने सापाला मोठा दगड … Read more

धर्माबरोबर शक्ती नसल्याने जगाचा नाश अटळ !

विज्ञानशास्त्र शक्तीशी संबंधित शास्त्र आहे, तर अध्यात्मशास्त्र हे शिवाशी संबंधित शास्त्र आहे. शक्ती शिवाच्या म्हणजे धर्माच्या (सत्याच्या) समवेत असेल, तरच कल्याणकारक होईल. शक्ती शिवाच्या समवेत गेली नाही, तर नाशक (विनाशकारी) होईल. सर्वत्र भगवान आहे, मग मल-मूत्र विसर्जन कसे करणार ? मनुष्याच्या शरिरात सहस्रो जीवाणू मल-मूत्र विसर्जन करतात, तरी तो अपवित्र होत नाही. परमेश्वराच्या शरिरातच सर्व … Read more