शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे…

शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे आणि हिंदु राष्ट्रच रामराज्य असेल ! : सर्वधर्मसमभाव, बुद्धीप्रामाण्यवाद इत्यादी विचारसरणींची सर्वपक्षीय सरकारे शाळेत साधना न शिकवता भाषा गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नसलेले विषय शिकवतात. पुढे परिणामस्वरूप भ्रष्टाचार, व्यसने, गुंडगिरी, बलात्कार इत्यादी वाढल्यावर सरकारे त्यांवर वरवरचे उपाय करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतात. यामुळे राष्ट्र अधोगतीच्या चरमसीमेवर आले आहे. याउलट हिंदु राष्ट्रात साधना शिकवली जाणार असल्याने कोणाच्याही मनात अयोग्य कृती करावी, असा विचारही येणार नाही. त्यामुळे रामराज्याची स्थापना पुन्हा झालेली असेल.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले