खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !

रुग्णांच्या वेदना न्यून करता येण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत वापरता यावी यासाठी खेड येथे ५ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ३ दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रा’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार

प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षीही येथील दशहरा मैदानावर ‘तरुण जत्रा’ या मराठी पदार्थ आणि संस्कृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्म, अध्यात्म, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

आपत्काळात वैद्यकीय साहाय्य समयमर्यादेत मिळणे कठीण असते. अशा वेळी बिंदूदाबन पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात.

घटनापूर्व चिंता (Anticipatory anxiety) यावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

घटनापूर्व चिंता, म्हणजे भविष्याबद्दल चिंता करणे, काहीतरी वाईट घडणार किंवा जे कार्य हाती घेतले आहे ते यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेता येणार नाही, याची चिंता वाटणे.

आळंदी (पुणे) येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सव निमि‌त्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान

‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवार, ८ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला.

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले आशीर्वाद !

पद्मनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे दि. २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी दर्शन घेतले.

सनातन संस्थेद्वारा हरमल, गोवा येथे आयोजित ‘जाहीर साधना प्रवचन’ संपन्न !

सनातन संस्थेद्वारे हरमल गोवा येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म  या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. सौ. शुभ सावंत व सौ. अंजली नायक यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. ह्यावेळी ४० हून अधिक जिज्ञासू व्याख्यानाला उपस्थित होते.

हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप प्रतिदिन अधिकाधिक करा !

हिंदूंनो, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर श्रीरामाच्या कृपेमुळे आपल्या पिढीला श्रीराम त्याच्या जन्मभूमीत विराजमान झालेला बघायला मिळत आहे. इतक्यावर आनंद मानणे योग्य रहाणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बाबरच्या आक्रमणापासून वाचवलेली श्रीरामाची मूळ मूर्ती स्थानापन्न असलेले अयोध्येतील प्राचीन श्री काळेराम मंदिर !

अखंड शाळीग्राम शिळेत बनवण्यात आलेल्या ५ मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये मध्यभागी श्रीराम, डावीकडे सीतामाता, उजवीकडे लक्ष्मण, तर एका बाजूला भरत आणि दुसर्‍या बाजूला शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती पाहूनच भाविकांचा भाव जागृत होतो.