देहली येथील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचा सहभाग

देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्‍रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रे’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या वतीने अध्‍यात्‍मप्रसार

इंदूर (मध्‍यप्रदेश) – येथील दसरा मैदानावर ‘तरुण जत्रे’चे (‘फूड फेस्‍टिव्‍हल’चे) आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धर्मजागृती आणि राष्ट्‍ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन, तसेच हिंदु धर्म संस्कृतीविषयी वैज्ञानिक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथील सेक्टर ९, गंगेश्वर कैलाशपुरी चौक, कैलाशद्वार येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन संस्कृती आणि ग्रंथ प्रदर्शना’ला भेट दिली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा गुढीपाडव्यानिमित्त संदेश

सध्या कधी नव्हे, एवढा सनातन धर्माच्या जागृतीच्या संदर्भात अनुकूल काळ आहे. याचे एक उदाहरण; म्हणजे या वर्षी १४४ वर्षांनी आलेल्या प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील महाकुंभमेळ्यात ६६ कोटी हिंदूंनी गंगास्नान करणे. याचा अर्थ सनातन धर्माचा अभिमान बाळगणार्‍या भारतातील अनुमाने ५० टक्के हिंदूंनी गंगास्नान केले. हा सनातनी हिंदूंमधील जागृतीचा परमोच्च काळ आहे.

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

धर्मशिक्षणाअभावी हिंदू पाश्चिमात्य विकृतीच्या आहारी जात आहेत. महिला धर्मपालन करत नसल्याने त्यांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

कलियुगात प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी धडपडतो; मात्र आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विविध त्रासांना सामोरे जावे लागते. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे आणि आपल्या कुलदेवीचा नामजप केल्यास प्रारब्ध सुसह्य होण्यास साहाय्य होते….

सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. कल्‍पना देशपांडे या ‘कै. शालिनी राव पारगावकर’ पुरस्‍काराने सन्‍मानित !

येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका आणि शिक्षिका सौ. कल्‍पना देशपांडे यांची ‘सरस्‍वती भुवन शिक्षण संस्‍थे’च्‍या वतीने शैक्षणिक कार्याबद्दल दिल्‍या जाणार्‍या ‘कै. शालिनी राव पारगावकर’ पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने आणि त्‍यांनी करून घेतलेल्‍या प्रयत्नांमुळे हा पुरस्‍कार मिळाल्‍याविषयी सौ. कल्‍पना देशपांडे यांनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

सध्‍या मनुष्‍याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्‍त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केले.

आनंदप्राप्तीसाठी धर्माचरण आवश्यक ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करणे अत्यंत आवश्यक असून या संस्कारांमुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर पुढे त्यांच्या कुटुंबियांनाही चिरंतन आनंद मिळेल. शाळेतील शिक्षणामुळे एकवेळ पैसा कमवण्याचा मार्ग मिळेल; पण धर्माचरण आणि योग्य संस्कार यांमुळे त्यांच्या भावी आयुष्याचा पाया पक्का होईल….

सनातन संस्थेच्या वतीने वाणेवाडी (पुणे) येथे जाहीर साधना प्रवचन पार पडले !

या वेळी आधुनिक वैद्या ज्योती काळे म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्ती आनंद मिळवण्यासाठी धडपड करत असते. हा आनंद मिळवण्यासाठी कलियुगात नामसाधना हा सोपा मार्ग आहे. नामामुळे प्रारब्ध नष्ट होते.