आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे जनक !

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सहस्रो वर्षांच्या कालपटलावर ठसा उमटवणारे अवतारी पुरुष !

सर्वसामान्य माणसाचे जीवन म्हणजे चिमण्या-पाखरं करतात, तसा चार काटक्यांचा संसार ! त्यातूनही जी व्यक्तीमत्त्वे स्वार्थ त्यागून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी जगतात, ते विभूती असतात. अशा अनेक विभूती भारताने अंगाखांद्यावर खेळवल्या आहेत.

प.पू. डॉक्टरांना झालेले त्रास आणि सनातन आश्रमाच्या परिसरातील वनस्पती, प्राणी अन् पक्षी यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे

आपण रहात असलेल्या वास्तूच्या परिसरात असणारी तुळशीची रोपे किंवा देवतांना जी फुले वाहाण्यात येतात त्यांची सात्त्विक झाडे आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यावरही होतो, असे म्हटले जाते…

पूर्वीच्या काळी समाजात सात्त्विकता निर्माण करणार्‍या ऋषिमुनींप्रमाणे कलियुगात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणारे प.पू. डॉक्टर !

सप्तर्षींनी सर्वांसाठी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदं प्रमाणं । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।, हा मंत्र दिला आहे. त्याद्वारे आपल्यावर निसर्गाची कृपा होणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला गुरु म्हणून प्राप्त झाले आहेत. ते आपल्याला नेहमी चैतन्याची महती सांगतात.

विविध संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्यक्ष कृती करून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणारे प.पू. डॉक्टर !

प.पू. (डॉ.) आठवले त्या वेळी अध्यात्माचा प्रायोगिक तत्त्वाने अभ्यास करत होते. प.पू. डॉक्टरांना त्यांच्या एका मित्राने प.पू. अण्णा करंदीकर यांच्याविषयीची माहिती सांगितली. प.पू. अण्णांना भेटल्यावर त्यांच्याकडून अपेक्षित असे मार्गदर्शन मिळेल, अशी खात्री प.पू. (डॉ.) आठवले यांना झाली….

समाजाच्या उत्थानासाठी साधना या विषयांवरील प्रवचनांच्या ध्वनीफितींच्या निर्मितीच्या माध्यमातून यज्ञ करणारे !

वर्ष १९९० ते १९९६ या कालावधीत संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य म्हणून काही जिल्हे, तालुके आणि शहरे या ठिकाणी प.पू. डॉक्टर अभ्यासवर्ग घेत असत. पुढे वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक या राज्यांमध्ये १०० हून अधिक जाहीर प्रवचने घेतली. सर्व ठिकाणच्या प्रवचनांचे चित्रीकरण करून त्यांचे एकत्रित संकलन करण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी सर्व प्रवचनांच्या वेळी एकच झब्बा आणि पॅन्ट वापरली….

सनातन अल्पावधीत व्यापक होण्यामागचे रहस्य !

सनातन संस्था अल्पावधीत विश्‍वव्यापी होण्यामागेही काही वैशिष्ट्ये आहेत; मात्र ही वैशिष्ट्ये आध्यात्मिक स्तरावरची आहेत.

मी… सनातनचे ग्रंथविश्‍व… परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धर्मदूत !

शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी प.पू. भक्तराज महाराज यांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार आणि कार्यासाठी दिलेले आशीर्वाद

प.पू. भक्तराज महाराज यांनी मला वर्ष १९९२ ते १९९५ या काळात धर्मप्रसार करण्याचा आशीर्वाद दिला. प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढतच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्य !

१. स्वतः वेशभूषेत न अडकणे आणि साधकांनाही त्यात न अडकवणे अन्य संप्रदाय किंवा संत यांच्याकडे वेशभूषेच्या संदर्भात काही नियमावली असते. काही ठिकाणी भगवे वस्त्र धारण करणे आवश्यक असते, काही ठिकाणी धोतर अनिवार्य असते. प.पू. डॉक्टर मात्र कुठल्याही वेशभूषेत अडकले नाहीत आणि त्यांनी साधकांनाही अडकवले नाही. हिंदु संस्कृतीनुसार वेशभूषा करावी, अशी त्यांनी शिकवण दिली; मात्र त्याचा … Read more