उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंचे अभिप्राय !
उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंचे अभिप्राय !
उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंचे अभिप्राय !
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर साधूसंत, महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पुढील गौरवोद्गार काढले.
उज्जैन – येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण विषयक प्रदर्शनात उज्जैन जिल्ह्याच्या भाखाड गावातील कु. विशाल मकवाना नावाचा युवक गळ्यात क्रॉस घालून आला होता. (हिंदूंना आपल्या देवतांचे महत्त्व माहीत नसल्याने अर्थात् धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु तरुण गळ्यात क्रॉस घालण्यासारख्या कृती करतात ! – संपादक) गळ्यात क्रॉस घातल्याचे लक्षात आल्यावर … Read more
पाऊस न पडणे, अवेळी पाऊस पडणे, काही भागांमध्ये अतीवृष्टी होणे, या केवळ नैसर्गिक आपत्ती आहेत, अशा भ्रमात रहाण्याचे अज्ञान आपण दाखवू नये.
संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.
उज्जैन – येथील दुसर्या वैश्विक अमृत स्नानाच्या निमित्ताने ९ मे या दिवशी ३० लाखांहून अधिक भाविकांनी आणि लाखो साधूसंतांनी क्षिप्रा नदीत पवित्र स्नान केले. या वेळी प्रचंड गर्दीचा ओघ असल्यामुळे पोलिसांना सर्वांना नियंत्रणात ठेवणे कठीण जात होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने यात्रा सुनियोजन करण्यात आले.
हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.
सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे.
सध्या सर्वत्रच देवतांचे विडंबन चालू आहे. त्यात धर्मशास्त्र आणि धर्मजागृती करण्याचे सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.
हिंदूंना स्वातंत्र्यपासूनच धर्मशिक्षण द्यायला हवे होते; मात्र हे धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे दुर्दैवी. धर्मशिक्षण नसल्याने आज हिंदु समाज आपापसांत भांडून धर्म आणि राष्ट्र यांची हानी करत आहे, असे प्रतिपादन धर्मजागरण समितीचे धार जिल्हा उपाध्यक्ष प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.