भोर येथील ‘सुभाष इंजिनीयरिंग वर्क्स’ या आस्थापनात ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आनंद शोधत असतो, तो मिळवून आनंदी जीवन जगायचे असेल, तर प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. शशांक मुळे यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

सनातन संस्थेने ‘हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळे’त ‘नामजपाचे महत्त्व’ सांगून नामजप केल्यावर आलेली अनुभूती

कार्यशाळेत राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड’कडून लक्ष्मीपूजनाचे शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण !

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड, (डी.एस्.पी.पी.एल्.), भोरपवणे’ यांच्या वतीने २४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्यामागील शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.

साधना करून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करणे, यांसाठी मनुष्यजन्म मिळालेला असतो. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे.

ऋषीमुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय बाळगले होते ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

श्री धन्वन्तरी देवता सर्व मानवांना आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. भारत देशाची ‘हिंदु संस्कृती’ श्रेष्ठ दर्जाची असून सारे जग आता आपले अनुकरण करत आहे. आपल्या ऋषी-मुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय त्यांच्या उराशी बाळगले होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले.

कोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाली. सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. सत्संगांत अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

ईश्‍वराची भक्ती केली, तर तो संकटकाळात आपले निश्‍चितच रक्षण करील, याची निश्‍चिती बाळगा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सावंतवाडी, देवगड, कुडाळ आणि कणकवली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्यांनी ‘ईश्‍वराची भक्ती केली, तर ईश्‍वर संकटकाळात आपले निश्‍चितच रक्षण करेल, याची निश्‍चिती बाळगा !’, असे प्रतिपादन करण्यासह उपस्थितांना साधनेसाठी दिशादर्शन केले.

बीड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यान

सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर श्री याज्ञवल्क्य वेद भवन या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

खेड शिवापूर (पुणे) येथील ‘क्राफ्ट पॉवरकॉन’ आस्थापनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन !

‘अध्यात्मानेच व्यक्तीमध्ये पालट होऊ शकतो. आजच्या काळात साधनेविना पर्याय नाही. तुम्ही प्रत्येक मासाला व्याख्यान, आध्यात्मिक प्रवचन घेऊ शकता’, असा उत्स्फूर्त अभिप्राय ‘क्राफ्ट पॉवरकॉन’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला.