नंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप !

जळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने सनातन संस्थेच्या संस्कार वह्यांचे आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सनातन संस्थेची संस्कार वही विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील, असा विश्वास या प्रसंगी श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला.

देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे !

उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.

भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र ! – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था

हलाल’च्या वाढत्या मागणीमुळे मांसविक्रीचा वार्षिक अनुमाने ३ लाख कोटी रुपयांचा संपूर्ण व्यवसाय धर्मांधांच्या नियंत्रणात जात आहे. हलाल व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी रचलेले एक षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

गुरुपौर्णिमा निमित्त बेंगळुरू (कर्नाटक) येथील आचार्य श्री महाप्रज्ञा शाळेत सनातन संस्था द्वारा आयोजित प्रवचन संपन्न

जीवनात संस्कारांना पुष्कळ महत्त्व आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपु नावाच्या राक्षसाचा पुत्र असूनही धर्माने त्याचा आदर्श घेण्यास सांगितले. त्यामुळे कुठे जन्म झाला ? यापेक्षा कोणते संस्कार झाले आहेत, हे मुख्य मानले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वजण उत्तम संस्कार वाढवून देशाचे उत्तम नागरिक होऊया

पनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी !

छत्रपती शिवरायांची कर्मभूमी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मभूमी रायगड येथील हिंदू एकता दिंडीत सहभागी धर्मप्रेमी हिंदूंनी हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त २८ मे या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडी काढण्यात आली.

गणरायाच्या सांगलीत ‘हिंदू एकता दिंडी’च्या निमित्ताने दीड सहस्र हिंदूंचा हिंदू एकतेचा हुंकार !

गणरायाच्या सांगलीत ‘जय श्रीराम’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हिंदु धर्म की जय’, अशा घोषणांनी मार्गक्रमण करणाऱ्या अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदू एकतेचा हुंकार देणाऱ्या हिंदू एकता दिंडीने सांगलीकरांची मने जिंकली.

क्षात्र आणि ब्राह्म तेजाचा हुंकार देणारी सातारा येथील भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ !

सातारा – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयाच्या दिशेने कार्यरत असणारे अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सातारा येथे २४ मे या दिवशी भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. दिंडीचा प्रारंभ शंखनादाने झाला. दिंडी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि सातारा शहराचे … Read more

नगर येथे हिंदु एकजुटीचा आविष्कार दर्शवणारी सनातनची ‘हिंदू एकता दिंडी’ पार पडली !

‘इस्कॉन’ संप्रदायाचे गिरीवरधारीदास प्रभु यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून आणि नंतर ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजाला पुष्पमाळ अर्पण करून गांधी मैदान येथून दिंडीला प्रारंभ झाला. पौरोहित्य सर्वश्री उपेंद्र खिस्ती आणि नरेंद्र खिस्ती यांनी केले.

जोशपूर्ण घोषणांनी हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून दुमदुमली सांगली नगरी !

श्री गणेशाच्या पावन नगरी सांगलीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २५ मे या दिवशी हिंदू एकता दिंडीमध्ये सहभागी १ सहस्र २०० हिंदूंनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् यासारख्या अनेक जोशपूर्ण घोषणा देऊन हिंदु राष्ट्राचा हुंकार दिला.