भुसावळ (जळगाव) येथे ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचन
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिरज येथील भारतभूषण प्राथमिक विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन झाले.
पिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय आणि कार्य यांची ओळख करून दिली. त्यानंतर ‘स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आणि शौर्यजागरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.
बहुचरामाता मंदिर, राजपुरा येथे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिराची सामूहिक स्वच्छता केली
कोपरगाव (जिल्हा नगर) येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. वनिता आव्हाड यांनी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेतले.
हरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.
गेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून यशस्वीपणे चालू आहे.
साधक हा नम्र, इतरांचा विचार करणारा, स्वतःची चूक स्वीकारणारा, सत्य बोलणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, व्यष्टी साधना तळमळीने करणारा असतो. म्हणूनच आपल्यात साधकत्व येण्यासाठी गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी युवा शिबिरार्थींना केले.
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन देण्यात आले.