अध्यात्माचा अभ्यास करण्यात शब्दांना असलेली मर्यादा

‘अध्यात्मात जास्तीतजास्त ५० टक्के एवढेच ज्ञान शब्दांत मिळू शकते. त्यापुढचे सर्व ज्ञान अनुभूतींनीच मिळते. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. १. जिथे साखरेची गोडी शब्दांत सांगता येत नाही, ती अनुभवावीच लागते, तिथे चांगल्या आणि वाईट शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती इत्यादी आध्यात्मिक परिभाषेतील शब्दांचा अर्थ शब्दांत कसा सांगता येईल ? २. लांबी, रुंदी, उंचीआणि काळ … Read more

अंतर्मनात अखंड नामजप चालू असल्याची लक्षणे

‘अंतर्मनात अखंड नामजप चालू आहे कि नाही, हे समजण्याच्या खुणा म्हणजे झोपेतून जाग आल्यावर नामजप चालू असल्यास ते अनुभवणे, संभाषण संपल्यावर नामजप चालू होणे, आपले काम चालू असतांना मधे मधे नामजपाची आठवण होणे इत्यादी.’ – डॉ. आठवले (२१.६.२००७)

नाम श्‍वासाला जोडण्यातील फायदे

हल्ली (अयोग्य विचारांमुळे) वायूमंडल बिघडलेले असल्यामुळे श्‍वासाबरोबर बिघडलेले (दूषित) विचारही मनात येतात आणि मनोविकार होतात. तसेच इतर विचारही मनात येतात. श्‍वासाबरोबर नामजप करतांना इतर विचारांचे प्रमाण अल्प होते आणि त्यामुळे विशिष्ट प्रकारचा अनुभव आल्याचे जिवास भासते. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

जमीनको आधार नहीं, आसमानको कबर नहीं, इन्सानको सबूर नहीं ।

भावार्थ : ‘इन्सानको सबूर नहीं’ म्हणजे व्यावहारिक अर्थाने फुरसत नाही, वेळ नाही आणि आध्यात्मिक अर्थाने आयुष्य इतके लवकर निघून जाते की, साधना करायला वेळच मिळत नाही. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

श्‍वास आणि नाम : नाम श्‍वासाला जोडणे

भावार्थ : आपण श्‍वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्‍वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्‍वासाला जोडायचे असते. श्‍वास नामाला जोडायचा नसतो. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

फकीरकी लकीर और लकीरका फकीर ।

भावार्थ : ‘फकीरकी लकीर’ म्हणजे फकीराची ललकारी, म्हणजे शिष्य. हाच पुढे ‘लकीरका फकीर’ म्हणजे ‘शिष्याचा गुरु’ होतो. लकीर (ललकारी) आणि फकीर यांच्यात जसे अद्वैत असते, तसेच पुढे गुरु-शिष्यात अद्वैत होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

सद्‍गुरुनाथा तू अपराधी । तुझेच अपराध घे पदरात ।।

भावार्थ : सद्‍गुरूंना शिष्याने एकदा सर्वस्व अर्पण केले की, शिष्याचे स्वतःचे असे काही उरत नाही; म्हणून अशा शिष्याच्या शरिराने किंवा मनाने काही चुका झाल्या, तर त्या एकप्रकारे गुरूंच्याच ठरतात ! गुरुच अपराधी ठरतात ! – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज

सासूके घरसे जवाई, बहनके घरसे भाई औरगुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते ।

भावार्थ : ‘गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते’ म्हणजे शिष्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय रहात नाहीत. एकदा एखाद्याला शिष्य केले की, त्याला पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी गुरु पार पाडतात. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज

जिज्ञासेमुळे तळमळ निर्माण होऊन आत्मज्ञान प्राप्त होण्यास साहाय्य होणे

‘एखाद्या गोष्टीची जिज्ञासा असली, तरच ती जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्यातूनच तळमळ निर्माण होते. आत्मज्ञानासंदर्भात तळमळ असली, तरच साधकाकडून साधनेसाठी तीव्र प्रयत्न होतात आणि शेवटी त्याला आत्मज्ञान होते.’ – डॉ. आठवले (मार्गशीर्ष शुद्ध पक्ष ६, कलियुग वर्ष ५११४ (१८.१२.२०१२)