आपत्काळ वेगाने येत असल्याने व्यष्टी साधना वाढवा !

आपत्काळ वेगाने येत आहे. प.पू. गुरुदेव नेहमीच सांगतात, ‘‘पाणी नाकापर्यंत आले आहे. त्यानंतर संधीच मिळणार नाही.’’ यासाठी व्यष्टी साधना आताच वाढवली पाहिजे. आपल्याला केवळ माध्यम बनायचे आहे आणि बाकी सर्व गुरुच करून घेणार आहेत. माध्यम बनण्यासाठी मन आणि बुद्धी या सर्वांची शुद्धी झाली पाहिजे. साधनेचा स्तर वाढल्यावर आपण परेच्छेने वागायला लागतो. साधकांमध्ये क्षमता आहे; म्हणून … Read more

गुरूंप्रती कृतज्ञता किती वाटते, त्यावर साधनेतील प्रयत्न अवलंबून असतात !

श्रीगुरूंनी आपल्याला भरभरून दिले आहे. त्यांच्याप्रती आपल्याला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते, यावर साधनेतील प्रयत्न अवलंबून असतात. साधनेत अल्पसंतुष्टता नको. ‘पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत’, याची जाणीव ठेवूया. ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, हाच गुरूंचा संकल्प आहे. सर्व साधक अध्यात्मात कधी पुढे पुढे जाण्याची गुरुदेव वाट पहात आहेत. आपण केलेले लहान लहान प्रयत्न पाहूनही गुरूंना आनंद होतो. ते … Read more

रज-तम प्रधान वातावरणातही साधकांची तळमळीने काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविना कोण आहे ?

गुरुदेवांचा प्रत्येक श्वास हा साधकांसाठीच असतो. त्यांना प्रत्येक क्षणी साधक आणि साधकच डोळ्यांसमोर दिसतात. गुरूंचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक विचार हा त्यांच्या साधकांसाठीच असतो. ‘आज साधकांसाठी काय करू ?’, ‘समष्टीसाठी काय देऊ ?’, अशीच त्यांची तळमळ असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे आणि त्यांच्या प्रीतीमुळेच साधकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र पालट होत आहेत. साधकांचे जीवन … Read more

क्रियमाण १०० टक्के वापरावे !

आपण काही वेळा ‘अमुक एक केले नाही, तरी देवाच्या कृपेने काही अडचण आली नाही’, असे अनुभव सांगतो किंवा ऐकतो. त्या वेळी आपले क्रियमाण योग्य न वापरल्यामुळे देवाला तेथे अधिक शक्ती व्यय करावी लागलेली असते. असे होऊ नये म्हणून आपले १०० टक्के क्रियमाण वापरावे. – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

कठोर प्रयत्न केले, तरच साधनेत प्रगती होते !

कुंभाराला एखादे मातीचे भांडे बनवण्यासाठी प्रथम माती चाळावी लागते. माती एकसारखी कालवावी लागते. लहानसे भांडे बनवण्यासाठी एवढी प्रक्रिया करावी लागते. असे आहे तर देवाशी एकरूप होण्यासाठी साधनेचे कठोर प्रयत्न करावे लागणारच ना ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

प्रयत्नांना तळमळीची जोड दिल्यास आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होणार आहे !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले आहे, तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. भावजागृतीचे प्रयत्न, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन प्रक्रिया, तसेच सेवा करतांना तिला तळमळीची जोड दिली, तर आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होईल. – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

तृतीय महायुद्धाच्या काळात स्वत:ला वाचवण्यासाठी साधना करा !

‘कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संत आणि पालक यांमधील भेद !

‘कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ – २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या सहस्रो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तिस-या महायुद्धाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सक्षम होणे आणि स्वतःचे रक्षण होणे यांसाठी तीव्र तळमळीने साधना करा !

‘तिसरे महायुद्ध जसे जवळ येत आहे, तशी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापूर्वी वाईट शक्ती साधक आणि समाज यांवर आक्रमण करत होत्या. आता आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने, तसेच तिसरे महायुद्ध जवळ आल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणाचे प्रमाणही त्या तुलनेत वाढत चालले आहे. आता वाईट शक्ती संतांवरही आक्रमण करत असल्याचे लक्षात आले … Read more

साधना मनोभावे सांगण्याचे महत्त्व

नवीन लोकांना भेटून ‘त्यांना साधना सांगणे, आपले कार्य सांगणे’, हे आपले साधनेतील कर्म आहे. त्या लोकांनी साधना करणे, न करणे हे त्यांचे कर्म आहे; पण आपण साधना सांगण्याचे आपले कर्म मनोभावे पूर्ण केल्याने त्यांच्या चित्तावर आपण सांगितलेल्या साधनेच्या गोष्टींचा संस्कार होतो. आपले कार्य त्यांच्या चित्तावर कोरले जाते. पुढे कुठल्यातरी जन्मात त्या लोकांना आपल्या कार्याचे, साधनेचे … Read more