जिज्ञासू

जिज्ञासूपणा असणे, म्हणजे आपल्यामध्ये नवनवीन शिकण्याची वृत्ती असणे. प्रत्येक गोष्टीतील नाविन्यता साधना करण्यात आपला उत्साह वाढवते. उत्साहामुळे नवनवीन शिकण्याची वृत्ती जागृत राहिल्याने आपला आनंदही टिकून रहातो. याच आनंदात ईश्वराची प्रसन्नता असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

ईश्वरप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाचा गुरूंनी सांगितलेली सेवा झोकून देऊन करतांना कितीही संघर्ष झाला, तरीही त्याने तो सहन करणे आवश्यक !

‘जर एखाद्या साधकाने सर्वसंगपरित्याग करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे, तर त्याने गुरु सांगतील ती सेवा झोकून देऊन करावी, मग कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल. या संघर्षाचे फळ गोडच असते. गुरु शेवटी साधकाला चिरंतन अशा आनंदमय ईश्वराची प्राप्ती करून देतातच; परंतु मायेचे तसे नसते. मायेत होणारा संघर्ष शेवटी आपल्या पदरात दुःखच टाकतो. … Read more

आध्यात्मिक स्तराचे महत्त्व

१. ‘उच्च आध्यात्मिक स्तर असला की, रज-तम यांचा परिणाम होत नाही. याउलट उच्च आध्यात्मिक स्तरामुळे निर्माण झालेल्या चैतन्याचा रज-तम यांच्यावरच परिणाम होतो आणि रज-तम अल्प होतात. २. आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात. ३. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांच्या पुढे पोचली, म्हणजे जीव संतपदाला पोचला की, त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवच … Read more

काळानुसार ‘उत्तम कर्म’ हेच ‘उत्तम ध्यान’ असणे

‘काळानुसार ‘उत्तम कर्म’ करणे, हेच सध्याच्या घडीला ‘उत्तम ध्यान’ आहे. केवळ ध्यानाने प्रगती होत नाही; कारण ध्यान लागण्याएवढी सात्त्विकता आपल्यात नसते. ती उत्तम कर्म करून मिळवावी लागते. उत्तम आचरण, उत्तम विचार आणि देवाचे उत्तम अनुसंधान यांमुळे देह सात्त्विक होऊ लागतो. असा देहच ‘उत्तम ध्यान’ करू शकतो.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. … Read more

कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढणे आणि याउलट संत कृती करून दाखवत असल्याने ते साधकांना अधिक प्रिय असणे

कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढू शकतो. त्यामुळे बरेच प्रवचनकार, कीर्तनकार आणि सत्संग घेणारे यांच्यामध्ये अध्यात्म कृतीत न आणल्याने ज्ञानाचा तीव्र अहं निर्माण होतो. ते आयुष्यभर लोकांना ज्ञान सांगतात; पण स्वतः त्याला अनुसरून कृती करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य नसते. याउलट संतांचे असते. संत अल्प … Read more

‘काशी (वाराणसी) येथे देह अग्नीअर्पण केला, तर मनुष्याला मुक्ती मिळते’, हे वचन सत्ययुगातच सत्य ठरणे’, यामागील शास्त्र

‘सत्ययुगात पृथ्वीवरील सर्वच लोक साधना करणारे असल्याने ते सात्त्विक होते. मृत्यूनंतर त्यांचे प्रेतही सात्त्विक असे. अशा साधना करणार्‍या आणि सोहम्भावातील जिवाला काशीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्नी दिल्यावर स्वतः शिव त्या जिवाच्या कानात ‘मुक्तीमंत्र’ सांगून त्याला मुक्ती देत असे. आता कलियुगात हा नियम लागू नाही; कारण आताचा मनुष्य सोहम्भावापासून पुष्कळ दूर आहे. देव न मानणार्‍या, देवाच्या कार्याला … Read more

देहासाठी जसा श्वास आवश्यक आहे, तसे साधनेसाठी सेवा आवश्यक आहे !

१. ‘स्वतःची प्रगती व्हावी’, असे वाटत असेल, तर साधकाने पूर्ण अंतर्मुख झाले पाहिजे ! २. साधकाच्या मनावर परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार झाला की, त्याचा साधनेतील वेळ वाया जात नाही ! ३. साधना कृतज्ञतापूर्वक करायला हवी. सतत देवाला नमस्कार करून त्याच्या चरणी अक्षरशः लोळण घेतली की, तो मार्ग दाखवणारच ! ४. ‘भगवंताला क्षणोक्षणी मन अर्पण करणे’, … Read more

दिलेली सेवा मनापासून, भावपूर्ण, झोकून देऊन केली, तर ती गुरूंच्या चरणी समर्पित होणार आहे !

कोणतीही सेवा अशी करायची की, ‘ती देवाला आवडली पाहिजे’. सेवा झाल्यावर स्वत:ला एकच प्रश्न विचारायचा, ‘देवा, तुला ही सेवा आवडली का ?’ त्यावर आतून देव जसे उत्तर देईल, त्यानुसार पुढे कृती करत रहायचे. जेव्हा ‘मी केलेली सेवा देवाला आवडायला हवी’, असा विचार असतो, तेव्हा आपल्याकडून ‘आळस करणे, सवलत घेणे’, असे होत नाही. दिलेली सेवा मनापासून, … Read more

झोकून देऊन साधना केल्यास हिंदु राष्ट्र येण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही !

मोक्षाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी गुरुदेवांनी आपल्याला त्यांच्या दिव्य चरणांशी आणले आहे. प्रत्येक साधकामध्ये अशी तळमळ हवी की, गुरुदेवांनी माझ्यासाठी एवढे केले आहे, तर मी गुरुचरणी किती कृतज्ञता व्यक्त करू ? गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी मी स्वत:ला किती झोकून देऊ ? ‘प्रयत्न करायला हवेत’, असा केवळ विचार नको, तर ते प्रयत्न प्रत्यक्ष कृतीत आणायला हवे. खरा … Read more

साधनेतील तळमळीचे महत्त्व

अ. गुरुकृपेने साधनेचे क्रियमाण वापरून प्रारब्धावरही मात करू शकतो ! : आपले गुरु एवढे महान आहेत की, ते प्रत्येक साधकाला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारच आहेत. ते प्रत्येकाला मोक्षाला घेऊन जाणारच आहेत. गुरूंवर अपार श्रद्धा ठेवून आपण साधनेचे क्रियमाण वापरूया. साधनेचे योग्य क्रियमाण वापरल्यास गुरुकृपेने आपण प्रारब्धावरही मात करू शकतो. आ. परिस्थिती अनुकूल कि प्रतिकूल हे … Read more