आई-वडिलांविषयी कृतज्ञता वाटली पाहिजे !

कोणी थोडेफार साहाय्य केले,तरी त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते.आई-वडिलांनी तर जन्म दिला आणि आपल्याला लहानाचे मोठे केले;म्हणून त्यांच्याबद्दल किती कृतज्ञता वाटली पाहिजे !आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची शेवटपर्यंत काळजी घेणे,हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. – (प.पू.) डॉ.आठवले (२९.७.२०१४)

पातळीनुसार भक्तीमार्गातील साधनेचे पुढचे पुढचे टप्पे

हल्ली बहुसंख्य व्यक्ती साधना करत नाहीत. साधना करणार्‍या बहुतेकांना साधनेत पातळीनुसार पालट होत जातो, हे ज्ञात नसते. त्यामुळे ते आयुष्यभर तीच साधना करत रहातात. कोणत्याही योगमार्गाने साधना करत असले, तरी असेच होत असल्याचे लक्षात येते. येथे भक्तीयोगाचे उदाहरण दिले आहे. भक्तीयोगातील प्रगतीनुसार साधनेतील टप्पे : साधनेचा प्रकार आणि स्तर अनुभव आणि अनुभूती साधकाची आध्यात्मिक पातळी … Read more

व्यष्टी साधनेसाठी गुरुमंत्र, समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसारचा जप आवश्यक

काही जणांना प्रश्‍न पडतो, आम्हाला गुरुमंत्र मिळालेला असतांना आम्ही कालमहात्म्यानुसारचा श्रीकृष्णाचा जप करायचा का ? याचे उत्तर आहे, गुरुमंत्र व्यष्टी साधनेसाठी आहे, तर समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसार श्रीकृष्णाचा जप वर्ष २०२३ पर्यंत आवश्यक आहे. वर्ष २०२४ पासून श्रीरामाचा जप आवश्यक असेल. गुरुमंत्र काळानुसार पालटत नाही, तर समष्टी साधनेसाठीचा जप कालमहात्म्यानुसार पालटतो. – (प.पू) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

व्यष्टी आणि समष्टी साधनेतील भेद आणि समष्टी साधनेचे महत्त्व

१. ईश्‍वर सूक्ष्मातीसूक्ष्म आहे, तसाच सर्वव्यापीही आहे. त्यामुळे ईश्‍वरप्राप्तीचे, म्हणजे ईश्‍वराशी एकरूप होण्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म होणे, म्हणजेच शून्यात जाणे किंवा सर्वव्यापी होणे, हे दोन मार्ग आहेत. सूक्ष्मातीसूक्ष्म होणे हा मार्ग व्यष्टी साधना करणार्‍यांचा असतो, तर समष्टीशी एकरूप होण्यासाठी आपली व्यापकता वाढवणे, हा मार्ग समष्टी साधना करणार्‍यांचा असतो. व्यष्टी साधना करता करता पुढे शून्यात जाऊन ईश्‍वराशी एकरूप … Read more

असे संत हिंदूंपुढे आचारधर्माचा आदर्श काय ठेवणार ?

संत एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करत आहेत, असे बर्‍याचदा पहायला मिळते. विविध संप्रदायांच्या नियतकालिकांतही तसे दर्शविणारी छायाचित्रे असतात. पाश्‍चात्त्यांप्रमाणे फीत कापून उद्घाटन केल्यामुळे दर्शनार्थी हिंदूंवर आपण अयोग्य संस्कार करत आहोत, याचेही त्यांना भान नसते ! – (प.पू) डॉ. आठवले (२०.११.२०१४)

बुद्धीप्रामाण्यवादी आणि प.पू. डॉक्टर यांच्या दृष्टीकोनांतील मूलभूत भेद म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसणे आणि प.पू. डॉक्टरांना जिज्ञासा असणे

बरेच ज्योतिषी माझा मृत्यूयोग जवळ आल्याचे गेली १० वर्षे सांगत आहेत. काही ज्योतिषांना मी जिवंत आहे, हे पाहून आश्‍चर्य वाटते. हे ऐकल्यावर बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतील, बघा. आम्ही म्हणतो ना, ज्योतिषशास्त्र खोटे आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले ! याउलट माझ्या मनात विचार येतो, माझा मृत्यूयोग असूनही मी गेली १० वर्षे जिवंत असण्याचे कारण काय ? जिज्ञासेमुळे … Read more

युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे

२५ वर्षे संमोहन उपचारतज्ञ म्हणून अनेक पती-पत्नींवर त्यांचे आपसात पटत नाही; म्हणून महिनोन्महिने उपाय केले, तरी त्यांचे फारसे जुळत नाही, हे लक्षात आले. याची दोन प्रमुख कारणे आहेत साधनेचा अभाव आणि कालमाहात्म्य. युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे युग पती-पत्नीचे एकमेकांशी पटण्याचे प्रमाण (टक्के) १. सत्ययुग १०० २. त्रेतायुग ७५ ३. द्वापरयुग ५० ४. कलियुग २५ ४ … Read more

अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, उच्छृंखलपणा !

शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. गुन्हेगारांना गुन्हे करायला, रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने, … Read more

अध्यात्मातील ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर लिखाण

ज्ञानपूर्व लिखाण ज्ञानोत्तर लिखाण १. लेखक सर्वसाधारण व्यक्ती संत २. स्तर बुद्धीचा बुद्धीपलीकडील ३. लिखाणाचा उगम ग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन अंतःस्फूर्ती (विश्‍वबुद्धीकडून प्राप्त होणारे ज्ञान) ४. चैतन्याचे प्रमाण (टक्के) ० – २ लेखकाच्या आध्यात्मिक स्तरानुसार ५० – ७० ५. लिखाण टिकण्याचा अवधी ५ – ३० वर्षे शेकडो ते हजारो वर्षे – (प.पू.) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

प.पू. डॉ. आठवले यांचा कर्मकांडांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे !

कर्मकांडानंतर उपासनाकांड येते. मी उपासनाकांडांतर्गत नामजपापासून साधनेला आरंभ केला. त्यामुळे मला यज्ञयागादीच नाही, तर साध्या पूजापाठाचीही ओढ नव्हती. असे असले, तरी विविध ठिकाणी होणार्‍या कर्मकांडांचे गेली १५ वर्षे ध्वनीचित्रीकरण करवून घेऊन मी ते संग्रही ठेवले आहे. त्याचा काय उपयोग हे मला ज्ञात नव्हते. २० ते २६ जून २०१४ मध्ये गोव्यात झालेल्या तिसर्‍या अखिल भारतीय हिंदू … Read more