साधना म्हणून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य केल्यास ईश्‍वर स्वतःहून साहाय्य करतो !

व्यवहारात कोणाचे साहाय्य हवे असल्यास त्यांना कार्याविषयी बरीच माहिती सांगावी लागते किंवा कोणाच्या तरी ओळखीने त्यांना भेटलो, तरच ते साहाय्य करण्याचा विचार करतात. याउलट संतांकडे गेल्यावर त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ही नावे सांगितली, तरी साधकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साधनेमुळे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयामुळे ते पुरेसे असते. खरे म्हटले, तर संतांना काहीच … Read more

सतत वर्तमानकाळात रहाणे

आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो. भावार्थ : ‘कर्म मागे’ म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करत नाही. ‘धर्म आमच्या पुढे असतो’ म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. ‘आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो’ म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)

एखाद्या विषयाच्या संदर्भात पाश्‍चात्त्य विचारसरणी आणि भारतीय (हिंदु) विचारसरणी यांत भेद असला, तर हिंदु विचारसरणी सत्य समजा !

याचे कारण हे की, हिंदु विचारसरणी लाखो वर्षांची आहे, उदा. सूर्यस्नान कधी करावे ?, याची वेळ पाश्‍चात्त्य सकाळी १० नंतर अशी सांगतात, तर हिंदु धर्मात कोवळ्या उन्हाची, म्हणजे सकाळी ९ च्या आधीची वेळ सांगितली आहे. तसेच हिंदु विचारसरणीत कधीही पालट होत नाहीत, तर पाश्‍चात्त्य विचारसरणीत काही वर्षांतच पालट होतात, उदा. वैज्ञानिक नवीन सिद्धांत सांगतात. – … Read more

साधना

वेद म्हणतात, तो (भगवंत) बृहद् झाला आहे. भगवंत विविध रूपांतून प्रकट होतो. माझ्या साहाय्यासाठी सर्व वस्तू आणि प्राणी आहेत. पहाण्याची दृष्टी पालटली पाहिजे. भगवंत माझ्यामधून कार्य करतो. माझी स्तुती ही भगवंताची स्तुती आहे; म्हणून त्याची बदनामी होऊ नये, असे वागणे म्हणजे साधना होय. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.८.२०१४) देवाण-घेवाण ‘आपण दुसर्‍याला … Read more

त्याग केल्यावर ईश्‍वरप्राप्ती होते !

साठवण्याने जडत्व येते. आपल्याकडे आहे त्या तन-मन-धन या सर्वांचा अधिकाधिक त्याग करण्याने हलकेपणा येत जातो. त्यामुळे वर वर देवाच्या दिशेने साधकाची प्रगती होते. शेवटी सर्वस्वाचा त्याग केला की, ईश्‍वरप्राप्ती होते. – (प.पू.) डॉ. आठवले (२५.८.२०१४) ज्या साधकांची साधना ईश्‍वरप्राप्तीसाठी असते, त्यांना एखाद्या संस्थेतील, संघटनेतील, पक्षातील पद, तसेच लोकप्रतिनिधीपद, मंत्रीपद किंवा अगदी पंतप्रधानपद यांची ओढ असेल … Read more

यश मिळण्यास आरंभ होण्याचे आणि ते टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण

हिंदु राष्ट्रासाठीच नव्हे, तर कोणत्याही उपक्रमासाठी प्रयत्न करण्याचा स्तर आणि यश मिळण्याचे, तसेच यश मिळण्यास आरंभ होण्याचे आणि ते टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण प्रयत्न करण्याचा स्तर यश मिळण्याचे तुलनात्मक प्रमाण (टक्के) यश मिळण्यास आरंभ होण्याचा तुलनात्मक कालावधी यश टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण (टक्के) १. शारीरिक ३० अल्प ५ २. मानसिक ५० मध्यम ३० ३. आध्यात्मिक १०० अधिक … Read more

मुले असंस्कारी असल्याचा परिणाम !

मातृदेवो भव । पितृदेवो भव । (तैत्तिरीयोपनिषद्, शीक्षा, अनुवाक ११, वाक्य २) म्हणजे आई आणि वडील यांना देव मानावे, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्‍या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती गरज सरो वैद्य मरो । अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्‍चर्य ते काय ? – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍यांनी शरीर सुदृढ रहावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

व्यष्टी किंवा समष्टी साधना करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।, म्हणजे धर्माचरणासाठी, म्हणजेच साधना करण्यासाठी शरीर हे महत्त्वाचे साधन आहे. याचा अर्थ असा की, शरीर सुदृढ असेल, तरच साधना चांगल्या तर्‍हेने करता येते; म्हणून व्यायाम, प्राणायाम, आसने इत्यादी करणे, तसेच योग्य आहार घेणे आवश्यक आहे. १. व्यष्टी साधना करणारे यांच्या दृष्टीने … Read more

‘मनाला सातत्याने वळण लावून आत्म्याशी अनुसंधानित करण्याचे प्रयत्न करावा. प्रत्येक कृती, उदा. चालणे, बोलणे, पहाणे आत्म्याशी अनुसंधानित करावी. ‘स्वतः करतो’, अशी जाणीव असल्यास कृती करतांना थकवा येतो; मात्र अनुसंधानित कृतीमुळे थकवा येत नाही.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)

सनातनचे प्रत्येक क्षेत्रातील साधक<br>ती गोष्ट सात्त्विक असावी, यादृष्टीने प्रयत्न करतात !

याचे एक उदाहरण म्हणजे वास्तूविशारद वास्तू बनवतात ती आर्थिकदृष्ट्या अल्प किमतीत आणि दिसायला चांगली हवी, या दृष्टीकोनातून बनवतात. याउलट सनातनचे वास्तूविशारद वास्तू बनवतात ती आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक कशी असेल, याचा विचार करून ! – (प.पू.) डॉ. आठवले