विज्ञानाची अपूर्णता आणि अध्यात्माची पूर्णता

मायेत पुढे पुढे अनेक शोध लागत जातात; कारण माया अनंत आहे आणि विज्ञान अपूर्ण आहे. याउलट अध्यात्मात नवीन शोध लागत नाहीत; कारण ईश्‍वर एक आहे आणि ईश्‍वरप्राप्तीचे सर्व मार्ग परिपूर्ण असल्याने काही शोध लावायचे बाकी नाही. – (प.पू) डॉ. आठवले

जीवन म्हणजे थोड्या काळासाठी एकत्र येणे आणि नंतर कायमचे दूर जाणे !

१. मुलगा जन्माला आल्यापासून नोकरी लागेपर्यंत जवळ रहातो; पण नंतर नोकरीच्या गावी जातो. २. मुलगी जन्माला आल्यावर लग्न होईपर्यंत जवळ रहाते; पण नंतर सासरी जाते. ३. नोकरी करतांना सहकार्‍यांबरोबर काही वर्षे असतात; पण नंतर सेवानिवृत्त झाल्यावर कोणाशीच भेट होत नाही. ४. पती-पत्नी काही वर्षे एकत्र; पण नंतर एक आधी मृत्यू पावतो. तात्पर्य, जीवन म्हणजे थोड्या … Read more

वाईट शक्तींचा त्रास दूर करणे आणि सत्त्वगुण वाढवणे, या दोन्हींसाठी नामजप उपयोगी

काही जणांना वाटते, वाईट शक्तींचा त्रास नसला, तर नामजप करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, स्वभावदोष रज-तम गुणांमुळे निर्माण होतात. नामजपामुळे सत्त्वगुण वाढतो. तो वाढला की, रज-तम गुण अल्प होऊ लागतात, म्हणजेच साधनेत प्रगती होऊ लागते. याचा अर्थ हा की, वाईट शक्तींचा त्रास दूर करणे आणि सत्त्वगुण वाढवणे, या दोन्हींसाठी नामजप उपयोगी … Read more

५० टक्के आणि त्यापुढील पातळीनुसार पुढील जन्म पृथ्वीवर होण्याचा कार्यकारणभाव

१. ५० ते ६९ टक्के पातळी : हे साधक पुढील साधनेसाठी स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेतात. २. ७० ते ८९ टक्के पातळी : या संतांना ईश्‍वरेच्छा ज्ञात असल्याने ते ईश्‍वरेच्छेने ईश्‍वरी कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतात. ३. ९० ते १०० टक्के पातळी : हे संत ईश्‍वराशी एकरूप होत असल्यामुळे त्यांच्या इच्छेत आणि ईश्‍वराच्या इच्छेत भेद नसतो. बहुधा … Read more

बुद्धीवाद्यांनो, साधनेच्या संदर्भात का ? आणि कसे ? यांत अडकू नका !

साधना करू इच्छिणारे; पण बुद्धीचा वापर करणारे काही वेळा साधनेच्या संदर्भात का ? कसे ?, असे प्रश्‍न विचारतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, का ? कसे ?, असे प्रश्‍न न विचारणारे साधनेत त्यांच्या पुढे जातात. पुढे त्यांचा बुद्धीलय झाल्यावर त्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे आतूनच समजतात. यावरून हे लक्षात येते की, कार्यकारणभाव ज्ञात नसला, तरी … Read more

मुले मोठेपणी चांगली व्हावीत, यासाठी त्यांच्यावर लहानपणीच साधनेचे संस्कार करा !

आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे (Prevention is Better Than Cure), अशा अर्थाची एक म्हण आहे. ती नुसतीच सांगण्याऐवजी मोठेपणी दुर्गुण असू नये, यासाठी लहानपणापासूनच सात्त्विक संस्कार करणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणी कचरा करू नकोस, खोटे बोलू नकोस, कोणाला मारू नकोस, असे मानसिक स्तरावरचे शिकवण्याच्या जोडीला त्याच्याकडून आध्यात्मिक स्तरावरील … Read more

बुद्धीप्रामाण्यवादी आणि सनातन संस्था यांच्या कार्यपद्धतीतील भेद

बुद्धीप्रामाण्यवादी धर्माचा काहीएक अभ्यास न करता धर्मातील अनेक गोष्टी खोट्या आहेत, असेे सांगतात. त्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडते आणि ते नास्तिक होतात. याउलट सनातन संस्था त्या गोष्टींमागचे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढते आणि ते साधक होतात. – (प. पू.) डॉ. आठवले

विज्ञानाचा खरा लाभ करून न घेतल्याने झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेलेला मानव

विज्ञानामुळे मानवाला यंत्रे, सोयी इत्यादी उपलब्ध करून दिल्यामुळे मानवाचा दैनंदिन कामातील बराच वेळ वाचला; पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे मानव सुखलोलुप झाला आणि झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेला ! त्याने रिकामे मन, भुताचे घर !, ही म्हण सार्थ केली आहे. तो ईश्‍वरापासून दूर गेला आहे. त्याने रिकामा वेळ साधनेसाठी वापरला असता, … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनी स्वेच्छेऐवजी परेच्छेला प्राधान्य न दिल्याने त्यांची आणि त्यांच्या विचारसरणीप्रमाणे वागणार्‍यांची अतिशय हानी होणे

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांची विचारसरणी असते, मला वाटते तेच बरोबर. मी तसेच करणार. यामुळे ते स्वेच्छेतच अडकतात. त्यांचा साधकांप्रमाणे स्वेच्छेऐवजी परेच्छेला प्राधान्य देणे आणि शेवटी ईश्‍वरेच्छेने वागणे, असा ईश्‍वराच्या दिशेने प्रवास न होता, ते स्वैराचारी हाेतात; म्हणून दिवसाही बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडगिरी इत्यादी अनेक गुन्हे घडतात. – (प. पू.) डॉ. आठवले

आत्मज्ञान

जे अज्ञात आहे, म्हणजे सध्या ज्ञात नाही, आठवत नाही, असे आत्मज्ञान सत्संग, सेवा यांद्वारे तात्पुरते आवरण निघाल्यामुळे (तात्पुरते) प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे आवरण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न येथे (आश्रमात) चालू आहे, उदा. संगणकाच्या हार्ड-डिस्कमध्ये माहिती आहे; मात्र ती त्याविषयी माहिती नसणार्‍याला अज्ञात आहे. जेव्हा आपण योग्य कळ दाबतो, आज्ञा देतो, तेव्हा ती प्रकट होते, दृश्य स्वरूपात … Read more