साधनेचा पाया असल्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना कार्यात यश मिळणे, तर इतर हिंदुत्ववादी संघटनांना विशेष यश न मिळणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य केवळ १० वर्षांत जगभर पसरले; कारण साधनेमुळे त्यांच्या कार्याला ईश्‍वराचा आशीर्वाद आहे. याउलट इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्य फारच थोडे होते; कारण त्या कार्यकर्त्यांकडून साधना करून घेत नाहीत. त्यांच्याकडून जे काही कार्य थोडेफार होते, त्याचा परिणामही अधिक काळ टिकत नाही. त्यामुळे भारत अधोगतीच्या परिसीमेला गेला आहे. – (परात्पर … Read more

आयुष्यभर तीच तीच साधना करू नका !

आयुष्यभर एकच साधना करत राहून साधनेच्या त्याच वर्गात राहू नका. त्याऐवजी जाणकारांना विचारून साधना करत पुढच्या पुढच्या वर्गांत जा आणि अंतीम ईश्‍वरप्राप्ती करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

९० टक्क्यांच्या पुढे अद्वैत निर्माण होत असल्याने वासनेचे विचार नष्ट होणे

जोपर्यंत मी आणि अन्य कोणीतरी असे द्वैत आहे, तोपर्यंत वासनेचे विचार येतात. कोणाशीतरी एकरूप व्हायचे आहे, असे वाटत असते; पण ९० टक्क्यांच्या पुढे द्वैत अल्प होऊ लागतेे. मी आणि अन्य कोणी हा भेद रहात नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत, असे वाटत असल्याने वासना रहात नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोणता जप करावा ?

१. व्यष्टी साधना : व्यष्टी साधनेला प्रारंभ करतांना कुलदेवतेचा (म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असल्यास कुलदेवीचा आणि त्यांपैकी एक असल्यास त्याचा किंवा तिचा), ती ज्ञात नसल्यास श्री कुलदेवतायै नमः ।, असा नामजप करावा. त्याच्याच जोडीला बहुतेक सर्वांनाच पूर्वजांचा त्रास असल्यामुळे श्री गुरुदेव दत्त । हा जपही करावा. गुरुमंत्र मिळाला असल्यास या दोन जपांऐवजी गुरुमंत्राचा जप … Read more

साधनेला घरच्यांनी विरोध करण्याचे कारण

समानशीलव्यसनेषु सख्यम् ।, म्हणजे ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात, त्यांच्यात मैत्री होते. यामुळे दारू पिणार्‍याला दारू पिणाराच आवडतो. त्याप्रमाणे साधना न करणार्‍यांना साधना न करणारेच आवडतात. साधना करणारे आवडत नाहीत; म्हणून ते साधना करणार्‍यांवर टीका करतात, त्यांना विरोध करतात. याउलट साधना करणार्‍यांची एकमेकांशी जवळीक होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे…

दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे बीज रूजत नाही; म्हणून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला गुरुकृपायोगात प्राधान्य दिले आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंची आध्यात्मिक स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे एक कारण म्हणजे वाणीत चैतन्य नसलेले कीर्तनकार, प्रवचनकार आणि तथाकथित संत

भारतात हजारो कीर्तनकार, प्रवचनकार आणि अनेक संत असूनही हिंदूंची आध्यात्मिक स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. याचे कारण हे की, त्यांतील बहुतेक स्वतः साधना करत नाहीत. ते केवळ दुसर्‍यांना साधना करण्यास सांगतात. साधना न केल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाणीत चैतन्य नसते. त्यामुळे श्रोत्यांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चुकांकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन !

चुका झाल्यानंतर अनेक जण त्याच विचारांत रहातात आणि सेवा करतांना चुका होतील, असा विचार करून तणावाखाली सेवा करतात. चुकांचा सतत विचार करायला नको. आतापर्यंतच्या शेकडो जन्मांत आपण अनेक चुका केल्या आहेत; पण तोे भूतकाळ झाला. त्यामुळे चुकांचा विचार करण्यापेक्षा चुका न होण्यासाठी काय करायला हवे ? याचा विचार करून सतत तसे प्रयत्न करायचे. – (परात्पर … Read more

कोणत्याही योगमार्गाने साधना करत असल्यास स्वभावदोष आणि अहं यांचे प्राधान्याने निर्मूलन करणे आवश्यक !

कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, हठयोग, कुंडलिनीयोग इत्यादी कोणत्याही योगमार्गाने प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंभाव न्यून असणे आवश्यक असते. सत्य, त्रेता आणि द्वापर युगांत मानवांत स्वभावदोष आणि अहंभाव न्यून असायचा. आता कलियुगात स्वभावदोष आणि अहंभाव अधिक प्रमाणात असल्यामुळे बहुतेकांची साधनेत प्रगती होत नाही. यासाठी साधक कोणत्याही योगमार्गाने साधना करणारा असला, तरी त्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं निर्मूलन … Read more

घराला आश्रम बनवण्याचे महत्त्व

घराचा आश्रम केल्यास घरातील सर्वांनाच त्याचा लाभ होतो. अशा घरातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने घराच्या आसपास असलेली अन्य घरे आणि तेथे रहाणारे लोक यांनाही त्या चैतन्याचा लाभ होतो, तसेच परिसराची शुद्धी होऊ लागते. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पृथ्वीचीच शुद्धी करायची आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले