साधनेचे महत्त्व
गुरु वाट दाखवतात. आपण त्या वाटेने चाललो, म्हणजे साधना केली, तरच पुढे जातो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गुरु वाट दाखवतात. आपण त्या वाटेने चाललो, म्हणजे साधना केली, तरच पुढे जातो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधकांना एखादे संत किंवा त्यांचे गुरु यांच्या संदर्भात अनुभूती येतात. त्या अनुभूतींची ते संत किंवा गुरु यांना बहुधा जाणीव नसते. अशा अनुभूती देवच ते संत किंवा गुरु यांच्यावर साधकांची श्रद्धा निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे रूप घेऊन देतो. क्वचित प्रसंगी संत किंवा गुरु स्वसामर्थ्याने अशा अनुभूती देतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधनेचा प्रवास २ – ३ पावले पुढे आणि एखाद पाऊल मागे, असा असतो. एखाद पाऊल मागे पडल्यावर त्याची काळजी करू नये. बसने प्रवास करतांना ती मधे मधे थांब्यावर थांबते. तेव्हा आपण काळजी करत नाही. ती पुढे जाणार आहे, याची आपल्याला खात्री असते. त्याचप्रमाणे साधनेत एखादे पाऊल मागे पडल्यावर साधना करणार्याने त्याची काळजी करू नये. तो … Read more
१. वाईट वाटून घेऊ नका ! : एखाद्या वैद्यांनी एखाद्या रुग्णाला त्याच्या आजाराचे निदान सांगितले, तर त्याला आनंद होतो; कारण आता योग्य उपचार होऊन आपण बरे होऊ, अशी त्याला खात्री वाटते. त्याचप्रमाणे एखाद्याला कोणी त्याच्या चुका सांगितल्या, तर त्याला वाईट वाटण्याऐवजी बरे वाटले पाहिजे; कारण आता तो त्या चुकांवर मात करून साधनेत पुढे जाऊ शकतो. … Read more
व्यावहारिक जीवनात आपल्याहून अधिक वयाच्या व्यक्तीला आपण नमस्कार करतो. याउलट अध्यात्मात वयाला महत्त्व नसते, तर आध्यात्मिक स्तराला महत्त्व असते ! लहान वयाच्या संतांनाही मोठ्या व्यक्ती आदराने नमस्कार करतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
याज्ञिकांनो, यज्ञात हविर्द्रव्यांसह, म्हणजे आहुती द्यायच्या वस्तूंसह स्वतःतील अहंभाव आणि स्वभावदोष यांचीही आहुती द्या ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधनेच्या मार्गानुसार देवघरातील देवांची संख्या पालटते. १. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना करणार्यांना अनेकातून एकात जायचे असते. त्यामुळे त्यांनी देवघरातील देवांची संख्या अल्प करत एकाच देवाच्या मूर्तीची किंवा छायाचित्राची पूजा करावी. कुटुंबातील इतर भक्तीमार्गी असल्यास देवघरात इतर देवांच्या मूर्ती किंवा चित्रे असतात; पण आपण मनातून एकाच देवतेकडे लक्ष द्यावे. २. समष्टी साधना : समष्टी साधना … Read more
राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात आणि पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पद्मभूषण, राष्ट्रपती पदक, नोबेल प्राइस यांपेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे अधिक महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
काही जणांना पूर्ण वेळ साधना करण्याची तीव्र इच्छा असते; पण घरी आई-वडिलांना पहाणारे कोणी नसते किंवा आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यामुळे ते पूर्ण वेळ साधक होऊ शकत नाहीत. अशांनी पूर्ण वेळ साधना करता येत नाही, अशी खंत करण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा मायेच्या नात्याने न करता त्यांच्याकडे गुरुरूप म्हणून पाहून सेवा केल्यास साधना होते. श्रावणबाळाने आई-वडिलांची सेवा … Read more