कार्य सत्य नसून कार्याचा कर्ता करविता ईश्‍वरच खरा सत्य होय !

कार्याचे व्यक्त स्वरूप आपल्यात दृष्यमान होत असते. त्यालाच आपण सत्य समजण्याची चूक करतो. प्रत्यक्षात कार्याचा कर्ता करविता (मन आणि ईश्‍वर) अव्यक्त असून तोच खरा सत्य असतो. अशा प्रकारे असत्याला सत्य मानल्याने सूक्ष्मातील ईश्‍वराशी आपले अनुसंधान रहात नाही. वास्तविक अव्यक्तच श्रेष्ठ असते.

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे.

आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।

भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला … Read more

गुरुकृपायोगाद्वारे साधना करून स्वतःमध्ये पालट घडवून आणा आणि गुरुकृपेने येणार्‍या कोणत्याही कठीण परिस्थितीला सामर्थ्याने सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांसाठी प.पू. पांडे महाराज यांचा संदेश ! दैनिक सनातन प्रभातच्या आदरणीय वाचकांना, सप्रेम नमस्कार. मानवाच्या हातून भूतकाळात घडलेल्या वाईट कर्मांचा परिणाम, म्हणजे आजची भयानक वर्तमान स्थिती आहे, जी आपण प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातमधून वाचत आहोत. भारतीय संस्कृती आणि संत-महात्मे यांनी मानवाला भौतिक अन् पारमार्थिक दृष्टीने समर्थ होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे … Read more

चैतन्य रूपात कार्य करणारी प्रभूशक्ती

‘आपल्या भारतामध्ये नदी, पर्वत, भूमी असे जे वातावरण आहे, ते सात्त्विकतेने, अध्यात्माने प्रभावित आहे, चैतन्याने युक्त आहे. त्याला नाहिसे करण्याचे आपणच ठरवलेले आहे, म्हणजे स्वतःचा आत्मघात करत आहोत. आपल्या देशातील नद्या या केवळ नद्या नाहीत. नदी म्हणजे चैतन्यरूपात कार्य करणारी प्रभुशक्ती आहे. हिमालय केवळ पर्वत नाही, तर ती देवाची शक्ती आहे.’ – प.पू. परशराम पांडे, … Read more

श्रीकृष्णाचे सारथ्य

कृष्णाने गीतेच्या ११ व्या अध्यायात सांगितलेले आहे. ‘हे पहा, युद्ध झालेलेच आहे. फळ मिळालेले आहे.’ आरंभीच त्याने इतिश्री सांगून टाकली, तरीपण युद्ध करतांना आलेल्या अडचणींना तोंड देण्यासाठी तो सारथी झाला. आपल्याला योगेश्‍वराचा (प.पू. डॉक्टरांचा) आधार आहे. त्यामुळे आपल्याला भिण्याचे कारण नाही. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र येणार आहे’, हे सांगूनच टाकले आहे, तरीपण येणार्‍या काळासाठी तोंड देण्याला … Read more

ईश्‍वरानुसंधान कसे साधावे ?

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन १. साधक : ‘साधक कसा पाहिजे ? जागृत, तत्पर आणि संवेदनशील ! २. यज्ञकर्म : कर्म करतांना त्यात भाव ओतला म्हणजे ते यज्ञकर्म होते. समजून घेऊन भावपूर्ण केलेले कर्म म्हणजे यज्ञकर्म ! त्यातून साधना होते. ३. साधना : मन, इंद्रीय आणि कर्म यांची योग्य सांगड घालून (ज्ञानपूर्ण आणि भावपूर्ण … Read more

भगवंताची वाणी दुसर्‍याला सांगतांना प्रत्येकाने त्यात स्वतःचे मत मिसळल्याने ज्ञानाचे मूळ स्वरूप झाकले जाणे, तर केवळ संतच मूळ सत्य स्वरूपाचे ज्ञान जसेच्या तसे कथन करू शकणे

‘भगवंताची वाणी एकाने दुसर्‍याला सांगतांना (परिवर्तित करतांना) त्यामध्ये प्रत्येक जण स्वतःचे मत मिसळत असतो. त्यामुळे ज्ञानाचे मूळ स्वरूप झाकले जाते. रज-तमाचे आवरण वाढून ते परिवर्तित होते. यामुळे धर्मग्लानी आली आहे. सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रयोग करतात. एका ओळीत २५ सैनिक उभे करतात. पहिला सैनिक एक गुप्त वार्ता दुसर्‍याच्या कानात सांगून, ती वार्ता जशीच्या तशी पुढील … Read more

मायेतील प्रत्येक वस्तूचा साधनेसाठी सदुपयोग करणे आवश्यक !

‘मायेतील प्रत्येक वस्तूला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहेच. जी मायेतून निर्माण झाली आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा लय होणारच आहे, हे ओळखून तिचा साधनेसाठी सदुपयोग करणे महत्त्वाचे ठरते.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१६)

निष्काम भावाने कार्य करण्याचे महत्त्व !

‘कोणत्याही कर्माचे फलित हे मायेतील असल्यामुळे ते क्षणिक असते. भगवंतप्राप्तीचे कर्म हे कायमस्वरूपी असल्याने ते शाश्‍वत आहे; म्हणून ज्यांनी निष्काम भावनेने सेवा केली, ते कायम आहेत. संतच निष्काम भावाने सेवा करू शकतात. त्यामुळे त्यांची सेवा कायम आहे. जे व्यापारी आहेत, कोट्यधीश झाले, त्यांच्यापैकी एकाचेही नाव इतिहासात येत नाही. तसेच राजकीय लोकांची वा अशा राजांचीही नावे … Read more