शिकवण्‍यापेक्षा शिकण्‍याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

‘ईश्‍वर सर्वज्ञानी आहे. आपल्‍याला त्‍याच्‍याशी एकरूप व्‍हायचे असल्‍यामुळे आपण सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणे आवश्‍यक असते. कोणत्‍याही क्षेत्रामध्‍ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्‍यात्‍म हे अनंताचे शास्‍त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्‍पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्‍याची प्रक्रिया केली पाहिजे. त्‍यामुळे ‘मी’पणा अल्‍प होणे … Read more

गुरूंवर अढळ श्रद्धा असली पाहिजे !

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

‘कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ मनुष्य जन्मातच भगवद़्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

‘आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्‍याला अशा रितीने उत्‍क्रांत व्‍हावयाचे आहे की, ज्‍यायोगे आपण भगवद़्‍धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्‍च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्‍याला या जीवनात प्राप्‍त करून घेता येते.’ (साभार : आत्‍मसाक्षात्‍काराचे विज्ञान)

प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदु धर्मात १४ विद्या आणि ६४ कला या मार्गांनी साधना शिकवता येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध होते आणि त्यामुळे हिंदु धर्मात आवश्यक ती साधना होणार्‍यांचे प्रमाण अन्य धर्मियांपेक्षा अधिक आहे.’ – सच्चिदानंद … Read more

अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधनेत स्थुलातील चुका सांगण्याचे महत्त्व !

‘साधनेमध्‍ये मनाच्‍या स्‍तरावर होणारी अयोग्‍य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्‍या अभावामुळे साधकाला स्‍वतःच्‍या चुका कळत नाहीत आणि त्‍या मनाच्‍या स्‍तरावरील चुका असल्‍यामुळे इतरांच्‍या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्‍य कृतीच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍त होत असते. त्‍यामुळे या अयोग्‍य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्‍यास त्‍याला त्‍याच्‍या अयोग्‍य विचारप्रक्रियेची जाणीव होण्‍यास साहाय्‍य होते, उदा. एका साधकाच्‍या मनातील … Read more

आध्यात्मिक विकास हाच समर्पक विकास !

तुम्‍ही स्‍वतःचा विकास करण्‍याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्‍ही आध्‍यात्मिकरित्‍या विकसित व्‍हा; कारण आध्‍यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे. तुम्‍ही अमेरिकन आणि युरोपियन यांची नक्‍कल करू नका. इंद्रियतृप्‍तीच्‍या (वासनेच्‍या) पायावर आधारलेली अशी संस्‍कृती टिकत नाही. मानवी जीवनाचा खरा दृष्‍टीकोन म्‍हणजे आध्‍यात्मिक दृष्‍टीकोन आहे आणि तो समजून घेण्‍याचा प्रयत्न करा.’ (साभार : आत्‍मसाक्षात्‍काराचे विज्ञान)

देवाचा शोध घेणे आवश्यक !

‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, हे लक्षात घ्या !

‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले