साधनामार्गात कितीही अडथळे आले, तरी आपल्यात जिद्द, चिकाटी, श्रद्धा आणि शरणागत भाव असेल, तर आपण सर्व अडथळे पार करून ईश्वतरप्राप्तीचे ध्येय गाठू शकतो !

एका साधकाने भ्रमणभाषवर चलचित्र पाठवले होते. त्यामध्ये एक बदक आपल्या ११ पिल्लांसह आहे. बदक आपल्या अन्नाच्या शोधात आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन जात आहे. मार्गात पायर्‍या लागतात. बदक त्या चढून सहज वर जाते; मात्र बदकाच्या पिल्लांना पायर्‍या चढणे सहज जमत नाही. ती छोटी छोटी पिल्ले एक एक पायरी चढण्यासाठी पुष्कळ श्रम घेतात. त्यात ती एक … Read more

साधकांनो, परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्या केवळ आज्ञापालनाने उद्धार होणारच आहे, अशी श्रद्धा ठेवून साधना करा !

आम्ही साधक पुष्कळ भाग्यवान आहोत. आम्हाला मानवजन्म मिळाला आहे. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या जन्माचे सार्थक होण्यासाठी निरनिराळे उपाय सांगितले आहेत. त्यांची साधकांवर कृपा आहेच. त्यांच्या केवळ आज्ञापालनाने साधकांचा उद्धार होणारच आहे, हे लक्षात ठेवून साधना करणे, एवढेच साधकांचे कार्य आहे.

समर्थ पाठीशी उभा असल्याची दृढ श्रद्धा असलेला निर्भयपणे कार्यरत रहातो !

समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे ?, असे समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे. समर्थ म्हणजे सम + अर्थ होय. समेला अर्थ आहे. त्यात शक्ती आणि चैतन्य आहे. विठ्ठल दोन विटांवर (द्वैत) उभा आहे, म्हणजे तो समेवर (लाभ होवो किंवा अपलाभ होवो, सर्व सारखे) उभा आहे, याचे दर्शक आहे. त्यामुळे कोटी कोटी ब्रह्मांडांचे ओझे … Read more

चैतन्याचा प्रसार करा !

सध्या आधुनिक कृत्रिम अशुद्ध धाग्यांनी बनलेले असात्त्विक कपडे वापरल्याने रज-तमाचा प्रसार होत आहे. एवढेच नव्हे, तर कपड्यांवरील नक्षीकामही अनिष्ट शक्तींनी भारलेले असते. साहजिकच त्यांतून रज-तमाचा प्रभाव वाढतो. यासाठी सात्त्विक वेशभूषा केली पाहिजे. सध्या आवडी-निवडीचा प्रसार केला जातो. माल विकला जावा, यासाठी दुकानदार त्याचे विज्ञापन करतो आणि आपण त्या प्रलोभनाला बळी पडून स्वतःचे पैसे व्यय करून … Read more

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

सध्याचे मराठी साहित्य संमेलन हे अगदी खालच्या स्तरावर चालू आहे. त्यामुळे साहित्याची अधोगती होत आहे. हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. साहित्य हे समाज आणि परिस्थिती यांचे दर्शन घडवते. ॐकाराला ब्रह्म म्हटले आहे. ॐकाराद्वारे शब्दांची निर्मिती झाली आहे. या शब्दसामर्थ्यामुळे मानवाला ज्ञान प्राप्त होत आहे. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य साधनेमुळे निर्माण होते; म्हणूनच ऋषिमुनींनी निर्माण … Read more

संयम ठेवून चांगले वागल्यासच प्रगती शक्य !

ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ – ईशावास्योपनिषद, मंत्र १ अर्थ : या जगातील प्रत्येक अणू-रेणूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व आहे. तेव्हा त्यागी वृत्ती (संयम) ठेवून जगाचा उपभोग घे. (आपल्या उन्नतीसाठी (प्रभुकार्यासाठी) कार्य कर); परंतु त्याच वेळी कुणाच्या धनाची अभिलाषा बाळगू नकोस. सध्या ‘बहिर्मुख राहून तसे वागल्याने आणि भगवंताने दिलेली … Read more

त्याग आणि संयम यांचे महत्त्व

‘वाईट गोष्टींचा प्रभाव वाढल्यावर सज्जन एकत्र येतात. सत्त्वगुणी लोकांची एकजूट होण्यासाठी वाईट लोक हे कारण आहे. एकत्रीकरणासाठी वाईट गोष्टी समोर येणे आवश्यक आहे. त्या आल्यावर दोघांचे युद्ध आणि संघर्ष चालू असतो. ‘हे भगवंताचे नियोजन आहे’, हे समजणे कठीण आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीतील सात्त्विकता गेल्यावर तिच्यात रज-तमात्मक बाजू निर्माण होते. एखाद्या … Read more

रज-तमात्मक गोष्टींना विरोध करून सात्त्विकतेला प्राधान्य द्या !

व्यापारी लोक लाभासाठी चिनी आणि रज-तमात्मक साहित्याची विक्री करतात. या मनोवृत्ती पालटल्या पाहिजेत. जे रज-तमात्मक गोष्टींना प्राधान्य देतात, त्यांना विरोध करून सात्त्विकतेला प्राधान्य देणे, हे आपले कार्य आहे.

साधकांनो, ‘चैतन्याद्वारेच कार्य होते’, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सिद्ध व्हा !

‘स्वतः दृढ निश्‍चय करून उठल्यासच कार्य होते. दुसर्‍याकडून अपेक्षा करून ते होत नाही. स्वतःवरील आवरण काढले, तरच चैतन्य दिसेल आणि चैतन्यात इतके सामर्थ्य असते की, तेच कार्य करतांना दिसून येते. अशा रितीने जेव्हा मोठ्या संख्येने साधक सिद्ध होऊन कार्यरत होतात, तेव्हा दावाग्नी पेटून रज-तमात्मक अशा वातावरणातील अनिष्ट शक्तींचे निर्मूलन सहज-सुलभ रितीने होते. अशा प्रकारे हिंदु … Read more