अध्यात्मात वेडे व्हा !

अध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’

आश्रमात रहाण्याचे महत्त्व

आश्रमात राहिल्याने आवड-नावड संस्कार घटतो, दुसर्‍याचे ऐकण्याची सवय लागते आणि परेच्छेने वागावे लागते. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते.

‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून आत्मानुसंधानात राहिल्यास देवाला अपेक्षित असे कार्य होईल !

‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्‍वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून … Read more

प्रार्थनेचा खरा लाभ म्हणजे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होणे !

आपल्या प्रारब्धात असेल, तेवढेच देव देतो. साधना न करता सकामातील नुसत्या प्रार्थना कितीही केल्या, तरी आपण मागतो, ते देव देत नाही. असे असतांना प्रार्थना करायची कशाला, तर प्रार्थनेमुळे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होते; म्हणून !

प्रश्‍न : भावाच्या पुढे कसे जायचे ?

भावाच्या पुढे अव्यक्त भाव असतो. गुरूंचे रूप समोर असतांना त्यांच्याप्रती भाव ठेवून कार्य करणे, हा ‘व्यक्त भाव’. गुरूंचे रूप समोर नसतांनाही त्याची अनुभूती घेत कार्य करणे, म्हणजे ‘अव्यक्त भाव’. हाच भावाच्या पुढच्या टप्प्याला जाण्याचा मार्ग आहे.

प्रायश्चित्ताने मन वळवले पाहिजे !

मन, आत्मा, इंद्रिये आणि वस्तू यांचे संतुलन अन् संयोग झाला, तर कार्य होते. योगः कर्मसु कौशलम् ।, म्हणजे समत्वरूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. मनाची शांतता आणि आत्म्याशी संतुलन होणे महत्त्वाचे. मन हे वृत्तीप्रमाणे बनते. त्यामुळे वृत्तीत पालट होणे महत्त्वाचे आहे. प्रायश्‍चित्ताने मन वळवले पाहिजे.

काळाला ईश्वर समजल्यास प्रारब्धावर सहजतेने मात करणे शक्य होत असणे

काळ हा आपल्याला अध्यात्म शिकवणारा उत्तम शिक्षक आहे. तो आपल्यासाठी परिस्थिती, परिणाम, प्रारब्धामुळे येणार्‍या सुख-दुःखाच्या गोष्टी असे सर्व घेऊन येत असतो. काळाला ईश्‍वर समजून सामोरे गेले, तर जीवनातील नित्य घडणार्‍या गोष्टींचे काहीच वाटत नाही. त्यामुळे आपल्याला प्रारब्धावर सहजतेने मात करता येते.

लोकहो, ‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते’, हे जाणा !

‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते; परंतु आपण बहिर्मुख होऊन आवरणाशी संबंध ठेवतो आणि ‘आवरणाद्वारे कार्य चालते’, अशी आपली भावना होते. त्यामुळे सामान्य जनतेची फसगत होत आहे. भौतिक सुखाच्या लालसेमुळे भौतिक सुखात रमणे, भौतिक सुखाची प्राप्ती करणे, यासाठीच सर्व वेळ घालवला जातो. विज्ञान आणि संशोधन हेसुद्धा याच विचारसरणीला पूरक झाले आहे. त्यामुळे … Read more

सध्याच्या संकटकाळात अनुभूती येत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा हिंदु राष्ट्र पहाता येण्यासाठी देवाने जीवित ठेवले आहे, या अनुभूतीविषयी सतत कृतज्ञ रहा !

काही साधकांचे साधनेचे प्रयत्न पूर्वीच्या तुलनेत चांगले चालू असतांनाही त्यांना अनुभूती येत नाहीत; म्हणून ते निराश होतात. देव प्रामुख्याने साधकाची अध्यात्मावरील श्रद्धा वाढण्यासाठी त्याला अनुभूती देत असतो. एखाद्याची अध्यात्मावर श्रद्धा असेलच, तर देव त्याला अनुभूती कशाला देईल ? सध्याच्या संकटकाळात सहाव्या आणि सातव्या पाताळांतील वाईट शक्तींची साधकांवर जीवघेणी आक्रमणे होत असतांनाही गुरूंच्या कृपेमुळे साधक जीवित … Read more