फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेला आरंभ केल्‍यावर ईश्‍वराला जाणून घ्‍यायची जिज्ञासा असेल, तर प्रथम स्‍वतःला जाणा !

‘साधनेला आरंभ केला की, कुणालाही ईश्‍वराला पहायची, त्‍याला जाणून घ्‍यायची ओढ लागते; पण आपण स्‍वतः स्‍वभावदोष आणि अहंकार यांनी मलीन असतांना आपल्‍याला शुद्ध आणि पवित्र असा ईश्‍वर कसा भेटेल ! ईश्‍वराला जाणून घ्‍यायचे असेल, तर आधी अंतर्मुख होऊन स्‍वतःला जाणले पाहिजे. ‘आपल्‍यात कोणते स्‍वभावदोष आणि अहंचे कोणते पैलू आहेत ?, तसेच आपल्‍यात कोणते गुण वाढवणे … Read more

केवळ अध्‍यात्‍माचा अभ्‍यास नको, तर प्रत्‍यक्ष साधना करणे महत्त्वाचे !

‘अध्‍यात्‍माच्‍या अभ्‍यासाने केवळ अध्‍यात्‍माचे शाब्‍द़िक ज्ञान होते. थोडक्‍यात त्‍यामुळे केवळ पांडित्‍य येते. तेे दैनंदिन जीवनात आचरणात आणणे कठीण असते. याउलट साधना केल्‍यास खर्‍या अर्थाने अध्‍यात्‍म जगणे होते. त्‍याने याच जन्‍मातही ईश्‍वरप्राप्‍ती करता येते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.५.२०२३)

ज्ञान आणि अज्ञान यांतील भेद

‘जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे. जे मायेत अडकवते, जे अशाश्वताविषयी सांगते आणि जे अहंकार जोपासते ते ‘अज्ञान’ आहे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१२.९.२०१७)

देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवण्याचे महत्त्व !

अ. साधकांनी ‘स्वतःकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया होत नाही’, असा विचार करत रहाण्यापेक्षा देवाशी अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘देवाशी असलेले अनुसंधानाचे विचारच साधकाला मोक्षापर्यंत नेतात; म्हणून देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवून प्रत्येक कृती करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’ आ. ‘प्रत्येक प्रसंगात समोरच्या व्यक्तीला छान (योग्य शब्दांत) उत्तर देणे’, ही … Read more

राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक-शिष्य होणे केव्हाही श्रेयस्कर !

‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण व्हावे’, यासाठी रुग्णालयातील रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, आधुनिक वैद्य, परिचारिका इत्यादी सर्वांनी अधिकाधिक नामजप करावा !

‘रुग्णालयात रुग्णांचे विविध कारणांनी मृत्यू होतात, उदा. अपघातग्रस्त, दीर्घकाळ रुग्णाईत असलेले रुग्ण, अकाली मृत्यू झालेले; तसेच लहान मुले इत्यादी. मृत्यूनंतर प्रत्येकाला लगेच पुढील गती मिळतेच, असे नाही. त्यांपैकी अतृप्त लिंगदेह किंवा वाईट लिंगदेह त्या रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका, स्वच्छता करणारे कर्मचारी, उपचारांसाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इत्यादींना त्रास देऊ शकतात. रुग्णालयात विविध व्याधींनी त्रस्त … Read more

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

‘काही इतर धर्मीय हिंदूंना चिडवतात, ‘देव एकच आहे, तर तुमच्या धर्मात अनेक देव कसे ?’ अशा अभ्यासशून्य व्यक्तींच्या हे लक्षात येत नाही की, हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. … Read more