जीवन-मुक्त
‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर – संदेश’, नोव्हेंबर २०००)
‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर – संदेश’, नोव्हेंबर २०००)
‘आपल्या मनातील विचार मोकळेपणाने इतरांना सांगितल्यास विचारांमुळे आपल्याला आलेला ताण अल्प होतो. बर्याच वेळा मनात येणारे विचार योग्य कि अयोग्य, हे न कळल्याने अस्वस्थता येते. अशा वेळी ते विचार उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. असे केल्याने अनावश्यक विचारात वाया जाणारा वेळ आणि ऊर्जा वाचते. विचारांवर वेळीच मार्ग न काढल्यास मनोदेहावरील रज-तमाचे आवरण वाढून अनिष्ट … Read more
‘सर्वसाधारण व्यक्ती जे काही करते, त्यामागे तिचा उद्देश ‘काहीतरी हवे’, असा असतो. याउलट साधक करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा उद्देश ‘सर्वस्वाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायची’, असा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पाश्चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘कुटुंब असो वा आश्रम असो, प्रत्येकाचा स्वयंपाकघराशी संपर्क असतो. त्यामुळे येथे सेवा केल्यास प्रत्येकाशी संपर्क येतो. येथे प्रत्येकाची आवड-नावड, पथ्य या सर्व गोष्टी कळतात. त्यामुळे अनेकांशी जवळीक होते. याचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे, आपण स्वतःला विसरून इतरांचा विचार करू लागतो. त्यातून अहं अल्प होतो आणि प्रेमभाव वाढतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.११.२०२१)
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पूर्वीच्या युगांमध्ये समाज सात्त्विक होता. त्यामुळे ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग यांसारख्या विविध मार्गांनी साधना करू शकत असे. कलियुगामध्ये समाज साधना करत नसल्यामुळे पूर्ण वातावरण रज-तमप्रधान झाले आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या साधनामार्गांनी साधना करणे अतिशय कठीण झाले आहे. अशा या रज-तमप्रधान वातावरणातही साधना करता येण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.११.२०२१)
‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात राहतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘प्रत्येक संतांचा साधनामार्ग आणि त्यांचे या भूतलावरील कार्य निराळे असते. काही संत चमत्कार करून लोकांचा अध्यात्म आणि देव यांवरील विश्वास वाढवतात. काही संत लोकांच्या सांसारिक समस्यांचे निवारण करून त्यांना साधनेसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देतात, तर काही संत साधकांकडून केवळ साधना करवून घेतात. याचा अर्थ संत प्रत्येक टप्प्याला अडकलेल्या जिवांना त्यांच्या टप्यातून पुढे घेऊन जात … Read more