अनुभूती विकत घेता येत नाही, तर त्यासाठी पात्र व्हावे लागते !

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आपण ज्या प्रमाणात किंवा ज्या टप्प्याची साधना (कृती) करू, त्या टप्प्याचे अध्यात्माचे विविध पैलू अनुभूतींच्या माध्यमातून लक्षात येऊ लागतात. प्रत्येक टप्प्याची अनुभूती येण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात साधना करून त्यासाठी सक्षम (पात्र) असणेही आवश्यक असते. कुणालाही पैसे देऊन अनुभूती विकत घेणे शक्य नसते. दुसरे म्हणजे एखाद्याने पात्रता नसतांना ती घेण्याचा प्रयत्न … Read more

साधनेच्या प्रयत्नांची ताकदच आपत्काळात आपल्याला तारून नेईल !

‘साधनेसाठीच्या अनुकूल परिस्थितीत साधनेचे प्रयत्न चांगले होतात. साधनेसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीत मात्र साधनेचे प्रयत्न चांगले होणे, हे साधनेच्या प्रयत्नांच्या ताकदीवर अवलंबून असते. ही ताकद प्रयत्नांची तळमळ आणि प्रयत्नांमधील नियमितता यांवर अवलंबून असते. ‘आगामी आपत्काळात कोणकोणत्या भीषण परिस्थितींचा आपल्याला सामना करावा लागेल’, याचा आपण आता अंदाजही करू शकत नाही. यासाठी आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण … Read more

साधना केल्याने आयुष्यभर आनंद मिळतो !

‘जेवतांना आवडीचे पदार्थ खातांना थोडा वेळ सुख मिळते. वासनेचे सुखही काही तासच टिकते. याउलट साधना करणार्‍याला आयुष्यभर आनंद मिळतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०२१)

लोकांच्या प्रारब्धानुरूप समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना, म्हणजे त्यांना साधना न शिकवता केवळ वरवरची उपाययोजना काढणारे संत !

‘बरेच संत त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या अडचणी सोडवण्यावर भर देतात. वस्तुतः या सर्व समस्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार किंवा त्याला असणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत असतात. त्यावर मूळ उपायोजना म्हणजे संबंधितांनी साधना करणे. संतांनी स्वतःची साधना खर्च करून त्यांच्या भक्तांच्या अडचणी दूर केल्या, तर तो भक्त परावलंबी होतो आणि प्रारब्धभोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माला … Read more

गुरूंच्या छत्रछायेचे महत्त्व !

साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो. – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.१२.२०१९)

साधना करतांना आपले क्रियमाणही वापरणे आवश्यक !

आजारी साधकाने त्याची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करायलाच हवेत. त्याशिवाय वैद्यकीय उपचारही करायला हवेत, तरच लवकर बरे वाटते. साधना करतांना सर्वकाही देवावर सोडून उपयोगाचे नाही; आपले क्रियमाणही वापरले पाहिजे, तरच योग्य पद्धतीने साधना केल्यासारखे होते. – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.१२.२०१९)

गुरुप्राप्तीसाठी लायकी हवी !

‘बहुतेकांना पुष्कळ प्रयत्न करूनही गुरुप्राप्ती होत नाही. याउलट अर्जुनाला काही प्रयत्न न करता श्रीकृष्णासारखा गुरु लाभला, म्हणजे त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असेल, हे लक्षात येते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदाच सांगितलेली गीता कळणे; पण इतरांना अनेकदा अभ्यासूनही न कळणे !

‘श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदाच आणि काही श्लोकांतच गीता सांगितली अन् अर्जुनाला ती कळली. यावरून अर्जुनाची क्षमता किती असेल, ते लक्षात येते. आपण गीता अनेकदा वाचूनही आपल्याला ती कळत नाही. त्यामुळे त्यानुसार आचरण करणे, तर दूरचीच गोष्ट झाली !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

साधना करण्याचे महत्व !

‘जे आध्यात्मिक क्षमता नसल्याने संतांचे ‘संतत्व’ ओळखू शकत नाहीत, त्यांनी संतांना ‘ते संत नाहीत’ असे म्हणणे, हे वैद्यकीय शिक्षण नसणार्‍याने एखाद्या वैद्यांना ‘ते वैद्य नाहीत’, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

संतांचे केवळ चरित्र वाचण्यापेक्षा त्यांची शिकवण आत्मसात करावी !

‘अनेक जण संतांचे चरित्र वाचतात, तर काही जण त्याची पारायणेही करतात. यात लक्षात घेतले पाहिजे की, संतांचे चरित्र वाचले, तर त्यातून ‘केवळ त्यांनी साधना कशी केली’, हे समजते. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी चमत्कार केल्याचा उल्लेख असेल, तर त्यातून आपल्या मनात केवळ त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होतो. त्यांची शिकवण अभ्यासली, तरच आपली साधनाही त्यांच्यासारखी होऊ शकते आणि आपल्या … Read more