आत्मचिंतनाची शेवटची सिद्धी म्हणजे मोक्ष !

‘मीपणा’ची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून, स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव होत होत ‘मीपणा’ची जाणीव शेष राहिली, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. अशा स्थितीने दु:खाची जाणीव न होता, देह भावाचा अभाव होऊन, कुठलीही चिंता न रहाता, केवळ एका आनंदाचाच अनुभव शेष रहाणे म्हणजेच ‘जीवनमुक्ती’ होय, यालाच ‘कैवल्य’ किंवा ‘मोक्ष’ असेही म्हणतात. ही आत्मचिंतनाची … Read more

ईश्वर हा ‘काळ’ असल्याने त्याच्याशी एकरूप झालेल्या संतांचे वागणे काळानुसार असते !

​‘एखाद्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने नुकतीच साधना करण्यास आरंभ केला, तर त्याला लगेच त्याच्या व्यसनाविषयी सांगणे योग्य नाही. ‘संतांना केव्हा काय करायचे ?’, हे ज्ञात असते; कारण त्यांना काळ कळतो. त्यामुळे वेळ आली की, ते त्या व्यक्तीला तसे सांगतात. तो त्यांच्याकडून झालेला एक उपदेशच असतो. वेळ आली की, आपोआपच त्या व्यक्तीचे दारूचे व्यसन सुटते. … Read more

अपेक्षा करणे

‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. अपेक्षापूर्ती झाल्यावर तात्कालिक सुख मिळते; परंतु त्यामुळे अहंचे पोषण होते आणि अपेक्षेप्रमाणे झाले नाही की, दुःख होते. म्हणजे दोन्ही प्रसंगांत साधनेच्या दृष्टीने हानीच आहे.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्या !

‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण. या दोन्ही रामायणांचा परिपोष जीवनात होणे, म्हणजे रामायण खर्‍या अर्थाने अनुभवणे होय. प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्यायचा प्रयत्न करा !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१५.४.२०२१)

देवाच्या अनुसंधानात राहून केलेली सेवा देवाला आवडेल !

‘पुढीलपैकी कोणत्या साधकाची सेवा देवाला आवडेल ? एक साधक सेवा करतांना ‘चूक तर होणार नाही ना ?’, या विचाराने (भीतीने) सतर्क राहून एक प्रकारे ‘चुकांच्या’ अनुसंधानात राहून सेवा करतो, तर दुसरा साधक ‘देवाच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा देवच करवून घेत आहे, ती करतांना काही चुका झाल्यास, देव मला माझ्या स्वभावदोषांची जाणीव करून देत मला साधनेत … Read more

सनातनचे कार्य प्रत्येक जिज्ञासूच्या उद्धारासाठी असणे !

‘भगवान त्याच्या केवळ एका भक्तासाठीही अवतार घेतो. याच तत्त्वाने सनातनचे कार्य चालू आहे, उदा. सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला एखाद्या ठिकाणी चांगला प्रतिसाद नसला, तरी त्या भागातील एका जिज्ञासूसाठी तेथे कार्य केले जाते. त्या एका जिज्ञासूची आध्यात्मिक प्रगती होणे महत्त्वाचे आहे. एखादा ग्रंथ प्रकाशित केल्यावर त्याची खूप विक्री झाली नाही, तरी चालेल; पण ‘ज्या जिज्ञासूला तो आवश्यक … Read more

आपल्यातील गुण ओळखून त्यांचा ईश्वराच्या सेवेत योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे !

देवाने प्रत्येकाला काहीतरी चांगले गुण दिलेले असतात. स्वतःमधील त्या दैवी गुणांना ओळखून त्यांचे संवर्धन करायला हवे. या गुणांचा देवाची सेवा, समष्टी सेवा आणि गुरुकार्य करणे यांसाठी लाभ करून घेता आला पाहिजे, तरच ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या या गुणांचे सार्थक झाल्यासारखे होईल. गुणसंवर्धनाने आपल्यातील साधनेचा उत्साह वाढल्याने मन अधिकाधिक सकारात्मक बनते. मनोबळ वाढले की, सेवाही चांगली … Read more

‘सेवेचे दायित्व घेणे, म्हणजे काय ?’, याची जाणीव होण्यासाठी मनाला पुढील प्रश्न विचारणे आवश्यक !

‘देवाने माझ्यावर सेवेचे दायित्व दिले आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून सेवा होत आहे ना ? मी देवाला अपेक्षित अशी सेवा करत आहे ना ? ‘सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळून सेवेच्या माध्यमातून साधनेचे ध्येय गाठणे’, या अनुषंगाने माझी सेवा चालू आहे ना ? ‘ही सेवा मला गुरूंच्या कृपेने मिळाली आहे’, याची सतत जाणीव ठेवून मी सेवेतून आनंद मिळवण्यासाठी … Read more

भक्त प्रल्हादासारखी खडतर साधना करणारा साधकच या आपत्काळात जिवंत राहील !

आपत्काळाची तीव्रता आता इतकी वाढत चालली आहे की, जे देवाचे खरे भक्त असतील, तेच या कठीण काळात टिकाव धरू शकतील. देवाने आता अशी चाळण लावली आहे की, ‘जे समष्टीचा विचार करून साधना करतील आणि ज्यांची देवावर पूर्ण श्रद्धा असेल, त्यांनाच तो पुढे घेऊन जाणार आहे. नाहीतर, आता ‘सुक्यासह ओलेही जळते’, या उक्तीप्रमाणे कधीतरी छंद म्हणून … Read more

बुद्धीचा वापर, हेच ज्ञानयोगानुसार साधना करतांना प्रगती जलद न होण्याचे कारण !

‘ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो. अन्य साधनामार्गांमध्ये ‘सांगितलेले केवळ कृतीत आणणे’, इतकेच असते. त्यात प्रारंभापासूनच बुद्धी कार्यरत नसते. त्यामुळे बुद्धीलय लवकर होतो. यामुळेच ज्ञानयोगाच्या तुलनेत अन्य साधनामार्गांमध्ये आध्यात्मिक प्रगती जलद होते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (४.१.२०२२)