ध्यानाचे लाभ आणि तोटे

ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)

अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान यांमधील भेद !

‘सच्चिदानंद ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे अध्यात्मशास्त्र सांगते, तर ‘ईश्वर नाहीच’, असे काही विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी ओरडून सांगतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

धार्मिक ग्रंथांचे नुसते वाचन किंवा पठण न करता त्यात शिकविलेली साधना कृतीत आणा !

‘विविध धार्मिक ग्रंथांचे कित्येक वर्षे काही लाख वेळा पठण केलेल्यांची साधनेत विशेष प्रगती झालेली आढळून येत नाही. याचे कारण हे की, ते नुसतेच पठण करतात. त्यात शिकवलेली साधना कृतीत आणत नाहीत. साधना करण्याची खरोखरीची इच्छा असणाऱ्यांनी ‘स्वत:कडून ही चूक होत नाही ना ?’, इकडे लक्ष द्यावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.३.२०२२)

साधकांना मायेच्या गोत्यात गुंतवणारे नातेवाईक !

‘साधना करणारा एखादा युवक त्याच्या जीवनाचे ‘साधना करणे’, हे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने मायेतील सर्व गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे नातेवाइक जगरहाटी म्हणून ‘लग्न कर’ यासाठी त्याच्या पाठी लागतात. त्याचे लग्न लावून दिल्यावर नातेवाइक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते त्याला साधनेसाठी किंवा संसारासाठी साहाय्य करत नाहीत. त्यामुळे तो युवक संसाराच्या अडीअडचणींमुळे साधनेपासून दूर … Read more

साधना करण्याचे महत्त्व

जे आयुष्यभर राबून अशाश्वत अशा विज्ञानाने मिळत नाही, ते साधनेत सेवा करून क्षणात मिळू शकते. हाच साधनेतील आनंद आहे. – श्रीचित्‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ, कुंभकोणम, तमिळनाडू. (२२.१०.२०१९)

देवदर्शन आणि देवस्मरण यांमधील भेद !

देवदर्शनाला स्थुलाचे बंधन आहे; पण देवस्मरणाला त्याचे बंधन नाही. आपण असू, तिथे त्याला अनुभवता येऊ शकते. त्यासाठी आपली तेवढी श्रद्धा आणि तळमळ हवी. -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन म्हणजे ईश्वरी ऊर्जेचे दर्शन !

आपण एखाद्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन घेतो, तेव्हा ते केवळ त्या व्यक्तीचे दर्शन नसून त्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी ऊर्जेचे दर्शन असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

ईश्वराचे खरे भक्त कधी होता येते ?

संतांचे मन ओळखून त्यांची सेवा करण्यासाठी उत्तम शिष्यासारखा भावच हवा, तरच ईश्वराचे खरे भक्त होता येते. -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

संत वर्तमानकाळात रहात असल्याने त्यांच्या मनाची शक्ती पूर्ण वापरली जाते

संतांना मागची आठवण नसते आणि त्यांच्या मनात पुढचा विचार येत नाही. संत वर्तमानकाळात रहात असल्याने त्यांच्या मनाची शक्ती पूर्ण वापरली जाते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ