‘समजून घेणे आणि सांभाळून घेणे’, म्हणजे साधना !

‘समजून घेणे, म्हणजे ‘अध्यात्म समजून घेणे’ आणि ‘सांभाळून घेणे, म्हणजे ‘अध्यात्म समजून स्वतः तसे जगणे अन् इतरांनाही आध्यात्मिक आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना साधनेत पुढे जाण्यास साहाय्य करणे.’ -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

भगवंताच्या अनुसंधानामुळे मन तणावमुक्त आणि शांत होणे

भगवंताचे अनुसंधान मनुष्याला तणावमुक्त करते. तणावमुक्त मन हे शांतीचे माहेरघरच असते. शांतीच्या स्पर्शामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते. योग्यांचे असेच असते. सर्वसामान्य मनुष्यापेक्षा योग्यांच्या दोन श्‍वासांतील अंतर अधिक असते. त्यामुळे योग्यांचे आयुष्यमान इतरांपेक्षा अधिक असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

देहात ‘मनमंदिर’ निर्माण करणे

मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

साधनेच्या प्रवासात अखंड सावधानता असणे आवश्यक आहे

१. महर्षींनी साधकांना श्रद्धा वाढवायला सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘विविध त्रास होत असतांनाही साधक साधना करतच आहेत, अजून किती करणे अपेक्षित आहे ?’, असा प्रतिप्रश्न विचारणे ​ ‘एकदा एका नाडीपट्टीवाचनामध्ये महर्षींनी साधकांना उद्देशून सांगितले, ‘‘साधकांची देवावरील श्रद्धा अजून वाढायला हवी.’’ यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘या आपत्काळातही तीव्र त्रासांमध्ये माझे साधक … Read more

मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे । समेत्य च व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन ॥ -रामायण, काण्ड २, सर्ग १०५, श्‍लोक २६ अर्थ : ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात. ‘कुठून तरी या संसारात एकत्र आलेले, … Read more

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

‘आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते. शुद्ध आहार, शुद्ध वृत्तीच्या मनुष्याकडून झालेली शुद्ध पाकसिद्धी, भोजनाच्या पंक्तीतही आपल्या नुसत्या दर्शनाने सद्भाव उत्पन्न करू शकणार्‍या उच्चकोटीतील आदर्श व्यक्तींची उपस्थिती आणि त्या समवेतच त्या … Read more

साधनेत आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होण्यासाठी ‘सेवा परिपूर्ण करणे’ अतिशय महत्त्वाचे आहे !

रामनाथी आश्रमात नामजपादी उपाय करण्यासाठी, तसेच एका हवन विधीची सिद्धता म्हणून एका पुरोहितांनी सांगितलेले महत्त्वाचे पूजा साहित्य एका साधकाने खोक्यातून चेन्नईहून रामनाथी आश्रमात पाठवले होते. हे साहित्य पाठवल्यावर त्याचा योग्य तो पाठपुरावा संबंधित साधकाकडून घेतला गेला नाही. तेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘साधनेत परिपूर्ण सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे. आपण जी सेवा करतो, त्या … Read more

दुसऱ्या कुणामुळे आपल्याला सुख-दुःख वाटणे, ही कुबुद्धी (चुकीचे) असून ‘मी करतो, मला येते’, असे वाटणे हा वृथा अभिमान असणे

१. ‘आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्या-वाईट घटना आणि प्रसंग यांसाठी आपण इतरांना उत्तरदायी समजत असतो; परंतु ‘जे घडत असते, ते केवळ आपल्या प्राब्धानुसार घडत असते. आपल्याच कर्माचे ते फळ असते’, हे समजून घेतल्यास इतरांविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया अल्प होऊ शकतात. २. मनुष्य पराधीन (ईश्वराधीन) आहे. कर्मयोगातील प्रसिद्ध श्लोक, तरी दुसरे काय सांगतो ? पुढील श्लोकातून हे … Read more

अन्नरसांचा प्रकृतीवर उत्तम परिणाम होण्यासाठी नामजप करत जेवणे श्रेयस्कर !

‘अन्न हे पवित्र घरचे आणि पवित्र भावनेने केलेले अन् पवित्र धान्यांचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते. जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात आणि तेच पुढे आपल्या प्रकृतीतही रुजू लागतात. आपणास इतर काही साध्य झाले नाही, तर जेवणास बसण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवून नामस्मरण करत वायफळ न बोलता, वाईट न ऐकता, ध्यानातच मन ठेवून अथवा पवित्र अध्यात्म … Read more

प्रारब्ध संपवण्याचे महत्त्व, पाप-पुण्य आणि कर्मफल !

१. इतरांमुळे प्रारब्धभोग संपण्यास साहाय्य होणे ‘एखादी व्यक्ती, उदा. पती, पत्नी, शेजारी, नातेवाईक अथवा अन्य आपल्याशी अयोग्य प्रकारे वागतात’, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात ते आपल्या प्रारब्धानुसार आपल्या जवळ आलेले असतात आणि ‘बुद्धी प्रारब्ध सारिणी’ या उक्तीनुसार ते तसे वागून आपल्याशी असलेले देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात. अशा प्रकारे ते आपले प्रारब्धभोग भोगून संपवण्यास साहाय्य करत असतात. … Read more