शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ

‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्‍वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

केवळ मनुष्य जन्मातच भगवद्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्याला अशा रितीने उत्क्रांत व्हावयाचे आहे की, ज्यायोगे आपण भगवद्धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्याला या जीवनात प्राप्त करून घेता येते. – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (साभार : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)

सिद्ध, अवलिया, योगी आणि संत यांनी सूक्ष्मातील जाणणे

सिद्ध, अवलिया, योगी आणि संत हे सतत निर्विचार स्थितीत असतात. त्यांना स्वतःचे असे काही विचार नसतात. ‘त्यांचे सर्वच ईश्वरेच्छेने चालू आहे’, याचे ज्ञान त्यांना झालेले असते. हे सिद्ध मायेच्या भौतिक जगात नसून दैवी जगात वावरत असतात. ते सतत ईश्वरी अनुसंधानात असतात. त्यांच्या मनाची निर्विचार स्थिती असल्याने त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिक असते. ते बाह्यतः अतिसामान्य … Read more

अनंत आणि सर्वज्ञानी ईश्वराशी एकरूप होण्यासाठी प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर साधना करण्याचा ध्यास वाढायला हवा !

ज्ञान अमर्याद आहे. ‘अनंताचे ज्ञान आहे’, असे म्हटले जाते. मग या ज्ञानाला सर्वतोपरी जाणणारा ईश्वरही अनंत नाही का ? या अनंताशी आपल्याला एकरूप व्हायचे असेल, तर आपल्याला किती साधना केली पाहिजे !; म्हणूनच आपल्या साधने संदर्भात आपण कधीच समाधानी असू नये. ‘प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर साधना करण्याचा ध्यास वाढतच जावा’, हीच त्या अनंताच्या चरणी प्रार्थना ! … Read more

नाम किती घ्यावे ?

​‘संत तुकाराम महाराज यांनी ‘नाम किती घ्यावे ?’, याविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिंक येणे, जांभई येणे आणि खोकला येणे, ज्यामुळे भगवंताचे नाम घेण्यात व्यत्यय येईल, इतकाही आमचा वेळ वाया न जावा.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

मनोविकार

मनोविकारांवर मात करण्यासाठी आपले आत्मबळ वाढवणे आवश्यक असते. त्यासाठी ‘भगवंताचे नाम’ ही आपली आत्मऊर्जा आहे. नामाच्या शक्तीने ईश्‍वराचे अनुसंधान वाढण्यास साहाय्य होते. ईश्‍वरी अनुसंधानाच्या ऊर्जेने आत्मबळ वाढून मनातील विकार दूर होतात. त्याने मनोबळही आपोआपच वाढते. मनाच्या दैवी शक्तीमुळे आत्म्यातील चिरंतन शक्तीची जाणीव होण्यास साहाय्य होते.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

द्वैत नष्ट करणे आणि द्वैतभाव संपणे

द्वैत नष्ट करणे साधनेतील एक प्रक्रिया आहे. ‘तू’ (देव) आणि ‘मी’ वेगळे आहोत’, या विचाराचे निर्मूलन होणे, याला ‘द्वैत नष्ट होणे’, असे म्हणतात. ‘स्वभावदोष निर्मूलना’च्या प्रक्रियेतून ‘मी’चे अस्तित्व संपून जाते, तर ‘अहं निर्मूलना’च्या प्रक्रियेतून देवाशी एकरूप होणे सोपे जाते. यालाच ‘द्वैतभाव संपणे’, असे म्हणतात. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

कला-उपासक आणि कलाकार यांच्यातील भेद

१. कला-उपासक : जो निरपेक्ष भावाने आणि त्यागी वृत्तीने ‘ईश्‍वरप्राप्ती’ हा उद्देश ठेवून कलेची साधना करतो, तो ‘कला – उपासक’ होय. कला-उपासक म्हणजे ‘कला हेच ज्याचे उपास्य दैवत आहे असा तो.’ १ अ. कला-उपासक म्हणजे कलेची उपासना करणारा, म्हणजे कलेलाच देव समजून समर्पित भावाने त्याच्या कलेचे सादरीकरण करणारा : ‘कलाकार’ या शब्दाच्या तुलनेत ‘कला-उपासक’ या … Read more

संगीतकला आणि वाद्यकला यांच्या माध्यमातून होणारी साधना

१. संगीतकला : संगीतकलेमध्ये देहाची आतून साधना होते. संगीत साधनेत साधकाचा देहच माध्यम असल्याने निर्माण होणारे चैतन्य थेट देहावर अंतर्बाह्य परिणाम करते. २. वाद्यकला : वाद्यकलेमध्ये देहाची बाहेरून साधना होते. बाह्यवस्तूचा आधार घेऊन चैतन्य निर्माण करावे लागते. वाद्यकलेच्या माध्यमातून देवापर्यंत जाणे संगीत साधनेच्या तुलनेत कठीण असते; परंतु देवाप्रती भाव असेल, तर अशक्य असे काहीच नसते. … Read more