सेवेची पूर्ण फलनिष्पत्ती कशी मिळेल ?

प्रत्येक सेवा ‘साक्षात् भगवंताची पूजा करत आहे’, या भावाने केल्यास ईश्वराला अपेक्षित अशी सेवेची पूर्ण फलनिष्पत्ती मिळेल ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

सत्संगाला वेळेत उपस्थित रहाण्याचे महत्त्व !

साधकांनो, सत्संगाच्या वेळी देवता, ऋषिमुनी आणि पुण्यात्मे यांचेही आगमन होत असल्याने सत्संगाला वेळेत उपस्थित रहा ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

साधना म्हणजेच आनंद !

‘साधना म्हणजेच आनंद ! साधनेतील आनंद अनुभवण्यासाठी त्या मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर चिकाटीने मात करतो, तो खरा साधक !’ – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाणे हे सातत्याने आचरणात आणायला हवे !

‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’ – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !

‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

परमेश्वरावरील श्रद्धा !

परमेश्वरावरील श्रद्धा म्हणते, ‘हे कार्य देवच करू शकतो.’ त्यापेक्षा अधिक प्रमाणातील श्रद्धा म्हणते, ‘देव हे करीलच !’; पण परमेश्वरावरील परमश्रद्धा म्हणते, ‘हे काम झालेच आहे !’ – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मनाला साधना करण्याचे वळण लावा !

‘ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।’, म्हणजे ‘मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच सांगत आहे.’ सत्य पालटू शकते, उदा. ‘देवदत्त तरुण आहे’, हे वाक्य आता सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही, उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य. म्हणजे सत्य आणि … Read more

मायेचे आकर्षण

सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते. भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते. (संदर्भ : प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनचा ग्रंथ ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)

मोक्षाचे अधिदैवत !

‘मोक्षाचे अधिदैवत म्हणजे सदगुरु !’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, ऑक्टोबर २००२)

ज्ञानोपदेश करणारे गुरु !

गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा. या दिवशी पाऊस असतोच. गुरुपौर्णिमा आणि पावसाळा यात काहीतरी समजून घेण्यासारखे आहे. पाऊस म्हणजे जलवर्षाव आणि जल म्हणजे जीवन. जीवनधारा तत्त्वांचा वर्षाव म्हणजे पावसाळा आणि याच वेळी गुरुपौर्णिमा येते. या दिवशी गुरुही जीवनधारा असे तत्त्व पावसाप्रमाणे वर्षतो. आत्मतत्त्वाचा म्हणजे आत्मज्ञानाचा वर्षाव करतो. पावसामध्ये सर्वसमत्व आहे. त्याचप्रमाणे गुरुही आप-पर, सुष्ठ-दुष्ट असे न … Read more