नामजप करतांना मनात विचार येत असल्यास काय करावे ?

नामजप करतांना मनात विचार येत असल्यास सूक्ष्मातून हवेत किंवा समोरील भिंतीवर नामजप लिहावा आणि तो पुनःपुन्हा वाचावा. त्यानंतर तो श्वासाला जोडावा. असे केल्याने नामजप एकाग्रतेने होतो.’ – पू. भगवंत कुमार मेनराय

नामजप परिणामकारक होण्यासाठी काय करावे ?

नामजप करत असतांना श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याला नामजप जोडावा. नामजपाला श्वास जोडण्याचा प्रयत्न करू नये; कारण तसे करतांना लय साधली गेली नाही, तर गुदमरल्यासारखे होईल. – पू. भगवंत कुमार मेनराय

अखंड कृतज्ञता…!

‘जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून कृतज्ञता व्यक्त करावी. सतत आणि अखंड कृतज्ञता व्यक्त केल्याने ‘भगवंतच सर्वकाही करत आहे’, हा संस्कार अंतर्मनावर होऊन अहंभाव अल्प होण्यास साहाय्य होते. – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

आस्तिकतेचे महत्त्व

‘आस्तिकता कोहिनूर हिर्‍यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे. प्रतिष्ठा, पत, मित्र, स्वकीय सगळे निरर्थक आहेत. स्वत:च्या शरिराचाही भरवसा नाही. मृत्यूपासून केवळ आस्तिकताच सोडवते. आस्तिकताच अमृतत्त्व देते. आस्तिकच मृत्यूचे निर्भयपणे स्वागत करू शकतो. आस्तिकाचे चित्त अखंड भगवंतातच असते. … Read more

स्वभावदोष आणि अहं

अ. (वाईट) सवयी मोडण्यासाठी ईश्वरासमोर ध्येय ठरवून घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करणे. आ. स्वतःचे निरीक्षण जागृत असले पाहिजे, तरच स्वतःतील अहंचे पैलू आणि त्रुटी लक्षात येतात. इ. जो स्वतःच्या चुका सांगतो आणि मान्य करतो, तोच ईश्वराला आवडतो अन् ईश्वर त्याचे रक्षण करतो. ई. ‘आम्ही जे करत आहोत, ते स्वतःच्या शुद्धीसाठी आहे’, हे लक्षात घ्यावे. – … Read more

मनमोकळेपणाचे महत्त्व

अ. जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते. आ. ‘मन मोकळे करणे’, म्हणजे ईश्वराने सुचवलेले बोलणे आणि सांगणे होय. मन रिकामे (मोकळे) केल्यानंतरच ते शांत होते. मनमोकळेपणा, म्हणजे ‘आपल्याला जे सांगावेसे वाटत नाही’, तेच सांगायचे. इ. मनोबलासमवेत … Read more

ईश्वराचे राज्य कल्पनातीत आहे !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मकार्यार्थ ईश्वराचा आशीर्वाद कसा प्राप्त कराल ?

‘ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आपण धडपड केली, तर ईश्‍वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्‍वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वराशी एकरूप होण्यासाठी व्यष्टी नाही, तर समष्टी साधनाच आवश्यक !

‘ईश्वर सर्व प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा, यासाठी कार्यरत असतो. हे त्याचे व्यष्टी नाही, तर समष्टी कार्य आहे. अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही समष्टी साधनाच (समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्नरत रहाणे) करणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.६.२०२२)

देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो. देवाला ओळखण्यासाठी, तसेच त्याच्या अस्तित्वाची देह, मन आणि बुद्धी यांना जाणीव होण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. साधनेत शीघ्र आध्यात्मिक प्रगती … Read more