अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे !
विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
व्यक्तीगत ग्रहांवरून व्यक्तीचे कालमहात्म्य कळते, तर मेदनीय ज्योतिष आणि संख्याशास्त्र आदींवरून समष्टीचे कालमहात्म्य कळतेे, उदा. भारताचे भविष्य पहाण्यासाठी देशाचे नाव, देश स्वतंत्र कधी झाला ती कुंडली; एखाद्या संस्थेचे भविष्य पहाण्यासाठी संस्था स्थापन झाली त्या वेळेची कुंडली, संस्थेचे नाव, संस्था प्रमुखाचे नाव आणि त्याची कुंडली; एखाद्या कुटुंबाचे भविष्य पहाण्यासाठी कुटुंब प्रमुखाची कुंडली. यावरून ज्योतिषशास्त्रात भारत इतर … Read more
इतर संघटना कार्याचे वार्षिक आणि आर्थिक अहवाल सादर करतात, तर सनातन संस्था साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा आणि ग्रंथ प्रकाशनांचा अहवाल सादर करते आणि हिंदु जनजागृती समिती धर्मसभा आणि धर्मरक्षणासाठीची राष्ट्रीय आंदोलने यांचा अहवाल सादर करते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या थाळीमध्ये जंतूंची वाढ प्रमाणाबाहेर झाल्यावर जंतूंना थाळीतील अन्न पुरत नाही. त्यामुळे ते मरतात. अशीच आता पृथ्वीची स्थिती झाली आहे. पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ७५० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात … Read more
मुसलमानांमध्ये धर्माविषयी बुद्धीभेद करणारे बुद्धीप्रामाण्यवादी नसल्याने त्यांच्यात एकजूट आहे आणि त्यामुळे ते आज सर्व जगाला भारी पडत आहेत. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंचा बुद्धीभेद केल्याने हिंदू साधनेपासून दूर गेले आणि त्यामुळे ते बलहीन झाले. – (प.पू.) डॉ. आठवले
एखाद्या विषयाचा त्या विषयाच्या पद्धतीनुसार अभ्यास केला नसला, तर त्याविषयी ठामपणे माझेच म्हणणे बरोबर आहे, असे कोणी म्हटले, तर ते कोणी गांभीर्याने घेत नाही. तीच स्थिती बुद्धीप्रामाण्यवाद्यांची असते. अध्यात्माचा अभ्यास, म्हणजे साधना न करता ते त्यासंदर्भात बोलत रहातात; म्हणून त्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची फलनिष्पत्ती शून्य असते ! – (प.पू.) डॉ. आठवले
मनाचा शरिरावर आणि शरिराचा मनावर परिणाम होतो; म्हणूनच मनाच्या काळजीने आम्लपित्त, रक्तदाब इत्यादी शारीरिक विकार होतात आणि शारीरिक विकारामुळे मनाला निराशा येणे इत्यादी विकार होतात. मनाचा शरिरावर परिणाम होत असल्यामुळे परिणाम होणार्या इतर अवयवांप्रमाणे हात आणि पाय यांच्यावरही परिणाम होऊन त्यांवरील रेषांतही पालट होतात. ते पालट केवळ या जन्मातील घटनांच्या संदर्भातील नसून जन्मोजन्मी तेच मन … Read more
प.पू. रामानंद महाराज प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. अण्णा कर्वे प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी एखादा राजा अत्याचार करायला लागला, तर ऋषीमुनी त्यांचे तपःसामर्थ्य वापरून त्याला धडा शिकवायचे. कलियुगाच्या सध्याच्या काळात प.पू. रामानंद महाराज, इंदूर यांनी ११.३.२०१४ या दिवशी देहत्याग करीपर्यंत अनेक अनुष्ठाने केली. प.पू. दादाजी वैशंपायन, प.पू. अण्णा कर्वे, प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी इत्यादी संत अहोरात्र साधना आणि … Read more
रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाची फुले आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना अधिक प्रमाणात लागतात. आंब्यांच्या झाडाचेही तसेच आहे, आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना जास्त आंबे लागतात. फुले-फळेही आश्रमाच्या दिेशेने जास्त प्रमाणात येतात, तर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्चर्य ते काय ? – (प.पू.)डॉ. आठवले (५.४.२०१४) रामनाथी आश्रमात आल्यावर तीर्थक्षेत्री गेल्याप्रमाणे लाभ होतो. … Read more
पंचमहाभूतांनी जग बनले आहे, असे सांगितल्यावर काही जणांना वाटते, हे कसे शक्य आहे ? त्यांना हायड्रोजनचे दोन भाग आणि ऑक्सिजनचा एक भाग एकत्र आले की, पाणी (H2O) बनते, त्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या विविध प्रमाणांतील एकत्रिकरणामुळे जग बनते, असे सांगितले की, त्यांना ते पटते. यांमुळेच सनातनचे ग्रंथ वैज्ञानिक पद्धतीने लिहिले आहेत. – डॉ. आठवले (२७.५.२०१४)