विरक्ताने जीभ आवरावी !

‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही. हे झाले सज्जन गृहस्थाचे. ज्यांना स्त्रियांचे आणि उपाहारगृहातील चटकदार पदार्थांचे व्यसनच लागले आहे. त्यांना कुबेराची संपत्तीही अल्पच पडेल. एकंदरीत पैशाचा विनियोग प्रायः एक स्त्री आणि दुसरी जीभ, या दोघींचा हट्ट पूर्ण करण्याकडेच होत असल्यामुळे … Read more

भारत भूमीची महानता !

‘भारत भूमीत जन्माला येणार्‍या प्राणीमात्रांनाही जे भाग्य लाभले आहे, ते पाश्‍चात्त्य देशांतील अधिनायकांनाही लाभलेले नाही.’ – प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय वर्षीय धर्मसंघ

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

१. पशूला द्रव्याचा लोभ नसतो; परंतु हाच द्रव्यलोभ माणसाला पशू बनवतो. २. ‘मी देह नाही’ हे म्हणण्यापेक्षा ‘मी आत्मा आहे’ हे म्हणण्यामुळे ‘नाहमकर्ताची’ जाणीव होऊन नरदेहाचे सार्थक होते. ३. आज आपल्या देशाची उन्नती करण्याकरता सुसंस्कृत माणसांची आवश्यकता आहे. केवळ सुशिक्षित असणे व्यर्थ आहे. (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

महिलांना मान देण्याविषयी मनुस्मृतीतील श्लोक

सुवासिनी: कुमारीश्‍च रोगिणो गर्भिणीः स्त्रियः । अतिथिभ्योऽग्र एवैतान् भोजयेदविचारयन् ॥ – मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ११४ अर्थ : सुवासिनी, कुमारिका, रोगी आणि गर्भवती स्त्रिया यांना अतिथीच्याही आधी भोजन द्यावे.

आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

आजची बिघडलेली तरुण पिढी !

‘चेन्नई येथील उच्च न्यायालयाने आजच्या तरुण पिढीविषयी खेद व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘चित्रपटातील अश्‍लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढीच्या मनामध्ये दुष्ट विचार येतात आणि त्यात हिंसाचाराच्या घटना दाखवल्यामुळे तरुण पिढीची मने बिघडली आहेत. यासाठी चित्रपट क्षेत्रातील लोकांनी स्वतःचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासावी.’

अशा आई-वडिलांची मुले कशी असणार ?

‘आपला मुलगा सात्त्विक व्हावा, ईश्‍वरप्राप्तीला लायक व्हावा’, असे पूर्वीच्या आई-वडिलांना वाटायचे. आता ‘आपला मुलगा शिक्षण घेऊन नोकरीला लायक व्हावा, विदेशात जावा’, असे आई-वडिलांना वाटते !’

रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७१ वर्षे अनुभवले आहे.’