अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये भाव आणि कुटुंबभावना वाढीस लागणे

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय ठेवून गेली ५ वर्षे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. प्रतिवर्षी भारतातील अनेक राज्यांसह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, या देशांमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. याचा झालेला लाभ म्हणजे या अधिवेशनांमुळे सर्व हिंदुत्वनिष्ठांमधील संघटितपणा टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आता एकमेकांविषयी कुटुंबभावना निर्माण झाली आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे अभेद्य संघटन उभे करत असणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परकीय आक्रमकांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली, तेव्हा काही अपवाद वगळता अन्य वेळी तत्कालीन हिंदु राजे, संस्थानिक, सरदार आदींमध्ये एकीचा अभाव दिसला. यामुळेच आक्रमकांना दीर्घकाळ हिंदुस्थानवर राज्य करता आले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंचे अभेद्य संघटन निर्माण व्हायला हवे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्यस्थितीत हिंदु अधिवेशनांसारख्या माध्यमांतून हिंदूंचे अभेद्य संघटन करत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले … Read more

इंग्रजी शिक्षण आणि आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींचा प्रभाव यांमुळेच भारतात हुंडाबळीच्या घटनांत वाढ होणे

सती आणि हुंडाबळी यांचा संबंध काय ? सतीची घटना १०० वर्षांत एखादीच घडते आणि हुंडाबळी हे प्रकरण इंग्रजी राज्य आणि इंग्रजी शिक्षण आल्यानंतर चालू झाले. इंग्रजी शिक्षणाने निर्माण केलेल्या आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींच्या चैनी, ऐषारामी जीवनाची ओढ, व्यक्तीस्वातंत्र्य, सनातन हिंदु धर्म परंपरा-रुढी-रिवाज यांकडे तुच्छतेने पहाण्याची वृत्ती, मुलींचे वाढते वय (म्हणजे २८ ते ३२ वर्षे किंवा त्यापेक्षा … Read more

‘ख्रिश्चन धर्मात हिंदु धर्मातून ‘अपराध स्वीकारणे’ आणि ‘प्रायश्चित्त’ घेतले आहेत

‘ख्रिश्‍चन धर्मात आमच्या हिंदु धर्मातून ‘अपराध स्वीकारणे’ (कन्फेशन) आणि ‘प्रायश्‍चित्त’ (रिपेंटन्स) घेतले आहेत. ख्रिश्‍चनांच्या ‘अपराध स्वीकारणे’ यामध्ये केवळ मानसिक स्तरावरची शुद्धीच अभिप्रेत आहे. वैदिक धर्मात मानसिक पापनिष्कृती तर आहेच, तसेच व्रताचरणादी काही शास्त्रीय कर्मे आचरावी लागतात.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (ग्रंथ ‘दिव्यत्वाची शिखरे’, प्रथमावृत्ती : वर्ष २०१०)

स्वार्थांध राजकीय नेते

‘आपण आपल्यातच गुंग आहोत. जनता स्वतःतच गुंग आहे. बहुतांश आमदार-खासदार स्वार्थाने आंधळे झाले आहेत. त्यांना देशाचे काही पडले नाही. त्यांना केवळ खुुुर्ची हवी आहे. अशा नेत्यांना दिसेल, तेथे खडसावा. असे नेते स्वतःही मरतील आणि आपल्या सर्वांना घेऊन मरतील. अधर्माचरणामुळे सध्याच्या हिंदूंची स्थिती सहिष्णुतेच्या अतिरेकामुळे सर्वांत मूढतेची झाली आहे. त्यामुळे ते धर्मांधांच्या अतिक्रमणापुढे नमते घेत आहेत. … Read more

गोवंश हत्या रोखण्याचा प्रभावी उपाय !

‘पूर्वी गोरक्षकांवर अत्याचार होत नव्हते, तर आता गोरक्षकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आता हिंदू पेटून उठतील. गोहत्या बंदी कायदा असूनही गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना आता मुभा मिळत आहे. जेव्हा हिंदू जागृत होतील, म्हणजे गोवंश हत्या करण्यासाठी देणार नाहीत, तेव्हा गोतस्कर हे गोतस्करी करू शकणार नाहीत.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

कुंभमेळे का होतात ?

‘आपल्याकडे कुंभमेळे का होतात ? मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या पवित्र नदीच्या पाण्यात महिनाभर साधुसंतांचे चैतन्य उतरावे आणि सर्वांना त्या चैतन्याला लाभ व्हावा, हा कुंभमेळ्याचा हेतू आहे.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)

चैतन्याने भारित झालेली संघटनाच प्रभावी कार्य करू शकणे !

‘भुशाची संघटित शक्ती म्हणजे लाकूड ! रेतीचे कण संघटित होऊन दगड बनतो. ही जी संघटित करण्याची शक्ती आहे, ते चैतन्यच आहे. अशा चैतन्याने भारित झालेली संघटनाच प्रभावी कार्य करू शकते. केवळ निष्क्रीय लोकांची संघटना कुठल्या कामाची ?’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१६)

स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्हाला तुमचा अभिमान आहे ! आम्हीही संकटांपुढे हार…

स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्हाला तुमचा अभिमान आहे ! आम्हीही संकटांपुढे हार न मानता शेवटपर्यंत झुंजतच राहू !! देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान क्रांतीकार्य करण्यासह अंदमानातील कारागृहात असतांना हिंदु बंदीवानांवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध तुम्ही दिलेला लढा, अतोनात शारीरिक आणि मानसिक यातना सोसूनही देशासाठी मृत्यूसमोर हार न पत्करण्याचा केलेला दृढ निर्धार, अंदमानातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हिंदूंच्या शुद्धीकरणाची आणि संघटनाची केलेली खटपट, … Read more

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७५ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.११.२०१६)