स्मशानामध्ये ‘अश्मा’ ठेवण्याची सोय करावी, हेही शासनाला न सांगणारे लज्जास्पद लोकप्रतिनिधी !

‘धर्मशास्त्रानुसार स्मशानातील अंत्यविधींसाठी ‘अश्मा’ अत्यावश्यक आहे; परंतु आजकाल शहरांमध्ये आवश्यक त्या आकाराचा दगड ‘अश्मा’ म्हणून मिळणे कठीण जाते. यासाठी शासनाने स्मशानभूमीमध्ये ही सोय करणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनो, लोकांच्या अशा लहान लहान आवश्यकता लक्षात घेऊन त्यांची स्वतःहून पूर्तता केली, तर निवडणुकांपूर्वी मते मागण्यासाठी घरोघरी जावे लागणार नाही, हे लक्षात घ्या !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले … Read more

कुठे हिंदु धर्माची श्रेष्ठता कळणारी उपकरणे तर कुठे अभ्यासू वृत्ती नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले !

‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणांना हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो !

‘प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो. प्रजा हल्लीसारखी स्वार्थी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात निष्क्रीय असली, तर लोकशाही कशी असते, याचे भारत हे जगातील एकमेव केविलवाणे उदाहरण आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देशभक्त आणि धर्माभिमानी हिंदूंनो, व्यापक व्हा !

‘राष्ट्र-धर्माभिमान्यांनो, फक्त स्वतःच्या क्षेत्रातीलच नको, तर व्यापक होण्यासाठी वैद्यकीय, न्यायालयीन, पोलीस, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच क्षेत्रांतील अन्याय शोधून त्याविरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे स्त्रीरक्षणासाठी आदर्श असणारे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे हिंदु धर्म आणि भारत दोघांसाठीही लज्जास्पद ठरणारे सध्याचे जन्महिंदू !

‘सीतेला रावणाने पळवले; म्हणून रामाने लंकेवर आक्रमण करून सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त केले. नरकासुराने बंदी केलेल्या १६,००० उपवर कन्यांना श्रीकृष्णाने त्याच्याशी युद्ध करून सोडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांवर अत्याचार करणार्‍या पाटलाचे हात-पाय तोडले. ‘स्त्रीरक्षण कसे करावे ?’, याचे अनेक दाखले हिंदूंसमोर असूनही भारतात प्रतिदिन स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. कुठे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, … Read more

हिंदु राष्ट्रात मनोरंजनाचे नव्हे, तर दर्शकाला शिकायला मिळेल आणि त्याचा वेळ सत्कारणी लागेल, असे कार्यक्रम दाखवले जातील !

‘सध्या संकेतस्थळे, दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात मनोरंजनपर कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. त्यांचा दर्शकांना काहीही लाभ न होता, त्यांचा वेळ वाया जाण्याचेच प्रमाण अधिक असते. कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. या अल्प कालावधीतच मनुष्य जीवनाचे मूळ ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्यासाठी वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करणे आवश्यक आहे. या कारणास्तव हिंदु राष्ट्रात दूरचित्रवाहिन्या वा अन्य कोणत्याही माध्यमांतून … Read more

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !

‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे शासनकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्म शब्दाचा अर्थ

‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्‍या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव यांच्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात आणि व्यष्टी साधनेसाठी जीवन समर्पित करू शकतात. आता काळानुसार समष्टी साधना, म्हणजे हिंदु … Read more

शोकांतिका !

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाइम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले