चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सनातन संस्था’ आणि ‘मंदिर महासंघ’ यांच्या वतीने शहरातील पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात ५ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले होते. ९ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी ६ ते १० मे २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात आलेल्या या संस्कार वर्गात ४० मुलांनी सहभाग घेतला.

आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था

अतिरिक्त कार्यभार, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि कौटुंबिक दायित्व यांमुळे आज शिक्षकांचा मानसिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ बाह्य उपायांनी नव्हे, तर नामजप, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांनी तणावावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येते.

सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो; मात्र सुखाच्या मागे धावल्यामुळे जीवन तणावग्रस्त होते. अध्यात्म हे एक शास्त्र असून त्याप्रमाणे आचरण केल्यामुळेच आपण खर्‍या अर्थाने आनंदी राहू शकतो. सध्याच्या आपत्काळात साधना आणि नामस्मरण यांविना पर्याय नाही. अध्यात्म ही आनंदी जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी शाळा-महाविद्यालयांत शिकवली जात नाही.

श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !

रामनाम संकीर्तनाचे स्वरूप : रामराज्यासाठी प्रार्थना : ५ मिनिटे, श्रीरामनामाचा जप : ५० मिनिटे, हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा : ५ मिनिटे

सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले माध्यम !

एका पालकांनी सांगितले, मुलांना बालसंस्कारवर्गात सहभागी होण्यासाठी वेगळी आठवण करून देण्याची आवश्यकता भासत नाही. ती स्वतःहून उत्साहाने वर्गात उपस्थित रहातात.’पालकांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून माझ्या लक्षात आले, ‘बालसंस्कारवर्ग मुलांवर संस्कार करणे, त्यांचे चारित्र्य घडवणे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होणे’, यांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत.’

सनातनच्या बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून आदर्श आणि सुसंस्कृत पिढीची निर्मिती ! – पालक

सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद (हरियाणा) येथील सेक्टर २९ मधील श्री सनातन धर्म मंदिरात ‘बालक-पालक परिचय’ समारंभ २५ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलांनी उत्साहाने सनातनच्या बालसंस्कार वर्गात शिकवलेल्या बोधप्रद कथा, आध्यात्मिक खेळ आणि भावार्थासह श्लोक सादर केले.

‘सांगली कृष्णामाई महोत्सव २०२६’च्या उत्सवात महिला सक्षमीकरण या विषयावर सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांचे प्रवचन

महिलांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने मुलांना ‘आई’ म्हणण्याचा आग्रह धरून आजच सक्षमीकरणाच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले पाहिजे. ‘आई’ हा शब्द अर्थपूर्ण आहे.

तणावमुक्त जीवनासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आत्मविश्वासाचा अभाव आणि मनावर उमटलेले संस्कार हे तणावाला ९० टक्के कारणीभूत ठरत आहेत. – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

नियमित स्वयंसूचनांची सत्रे केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही प्रत्येकाला भेडसावणारी एक समस्या आहे. आत्मविश्वासाच्या अभावासह आपले व्यक्तीमत्त्व आणि चित्तावरील संस्कार त्याला ९० टक्के कारणीभूत असतात. तणाव घालवण्यासाठी अंतर्मनातील मूळ स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचनेचा चांगला लाभ होतो.

कळंबोली (नवी मुंबई) येथे मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी बालक-पालक मेळावा !

मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकत्व ही सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. ती केवळ मुलांच्या मूलभूत, पालनपोषणाच्या गरजा पुरवण्यापुरती मर्यादित नसून मुलांना आधुनिक आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या जगात वावरतांना संस्कारक्षम बनवण्याचे मोठे दायित्व अंगीकारते.