दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

    चतुर्थी

    गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा व चतुर्थीचा संबंध जोडला गेला.


    चिंचवडचे मोरया गोसावी

    अष्टविनायकाच्या आठही क्षेत्रांत चिंचवड नाही; पण १४ व्या शतकात पुण्याजवळील गणेशभक्‍त मोरया गोसावी हे खूप प्रसिद्ध आहेत. श्री गणेशभक्‍त मोरया गोसावी यांच्या अखंड वास्तव्याने लाखो गणेशभक्‍त चिंचवडला येतात. मोरया गोसावींनी श्री गणेशाची तपश्चर्या केली. श्री गणेशांनी त्यांना वाघाच्या रूपात दर्शन दिले. त्या जागी वाघांची मुखे असलेल्या दोन शिळा दिसू लागल्या. या जागी श्री गणेशाचे शिळास्वरूप वास्तव्य आजही पहावयास मिळते. या क्षेत्राचे व्यवस्थापन येथील मोरया गोसावी संस्थानकडे आहे. मोरया गोसावी यांच्या नावावरूनच `मोरया' हा शब्द रूढ झाला.


    कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

    १. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

    २. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


    पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

    १८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


    विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

    हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


    खगोलशास्त्रावर प्रभुत्व

    असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

    कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


    सनातनची सात्त्विक उत्पादने

    वितरणासाठी संपर्क

    • मुंबईः ३२४३५६९९

    • ठाणेः ९३२२६५२५८०

    • रायगडः २७४५०३३८

    • पुणेः ९४२२४३७१३४

    • जळगावः ९४२३०५६४०३

    • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

    • नाशिकः ९४२२४४१७८२

    • इ-मेलः dainik@sanatan.org

गणपतीविषयक - आध्यात्मिक माहिती

अनुक्रमणिका

 


श्री गणेश पूजाविधी

श्री गणेशाची पूजा करतांना अंत:करणात भाव असेल, तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल !
कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो, म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते. याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह येथे देत आहोत. अध्यात्मात `भाव तेथे देव' हे तत्त्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करतांना अंत:करणात भाव नसेल, तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशाची पूजा करतांना `प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे', या भावानेच सर्व उपचार करावेत.

१. पूजेची सिद्धता
१ अ. पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? : पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही.

१ आ. पूजासाहित्य : १. पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम, २. हळद १०० ग्रॅम, ३. सिंदूर २५ ग्रॅम, ४. अष्टगंध ५० ग्रॅम, ५. रांगोळी पाव किलो, ६. अत्तर १ डबी, ७. यज्ञोपवीत (जानवी) २ नग, ८. उदबत्ती २५ नग, ९. कापूर २५ गॅ्रम, १०. वाती ५० नग, ११. कापसाची वस्त्रे ६ (७ मण्यांची), १२. अक्षता (अखंड तांदूळ) १०० ग्रॅम, १३. सुपार्‍या १५ नग, १४. नारळ ५ नग, १५. विड्याची २५ पाने, १६. तांदूळ १ किलो, १७. १ रुपयाची १० नाणी, १८. तिळाचे तेल १ लिटर, १९. शुद्ध तूप १०० ग्रॅम, २०. फुले १ किलो, २१. फुलांचे ३ हार, २२. तुळशी (२ पाने असलेली) २५ टिक्शा, २३. दोनशे दूर्वा, २४. बेलाची १५ पाने, २५. फळे (प्रत्येकी पाच प्रकारची) १० नग, २६. पत्री, २७. देवाची मूर्ती (गणपति) १, २८. चौरंग १ नग, २९. पाट ४ नग, ३०. कलश १ नग, ३१. ताम्हण ३ नग, ३२. घंटा १ नग, ३३. समई २ नग, ३४. निरांजने ४ नग, ३५. पंचपात्री १ नग, ३६. पळी १ नग, ३७. तबक (ताटे) ५ नग, ३८. वाट्या १५ नग, ३९. पातेली १ नग, ४०. आम्रपल्लव ५ टाळे, ४१. एकारती १ नग, ४२. पंचारती १ ाग, ४३. एक काडेपेटी, ४४. पराती १ नग, ४५. मोदक ३५ नग, ४६. करंज्या १५ नग, ४७. धूप १०० ग्रॅम, ४८. खण १, ४९. तोरणाचे (माटोळी) साहित्य, ५०. देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड), ५१. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी)

१ इ. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे

१ इ १. पूजास्थळाची शुद्धी

अ. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या जिवानेच केर काढावा.
आ. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.
इ. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

१ इ २. उपकरणांची जागृती : देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.

१ ई. रांगोळी काढणे
१. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी.
२. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असतांना तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.
३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्‍त असलेली काढावी.
४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

१ उ. शंखनाद करणे
१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्‍न करावा.
२. श्‍वास पूर्णत: छातीत भरून घ्यावा.
३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्‍वासात वाजवावा.
४. शंखिणीचा नाद करू नये.

१ ऊ. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे : सर्वसाधारण पूजकाने (३० टक्के पातळीपर्यंतच्या) आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळया जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. शक्यतो पाट रंगवलेला नसावा ३० ते ५० टक्के पातळीच्या पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या पूजकाने कोणतेही आसन घ्यावे. आसनाखाली रांगोळी काढावी. रेशमी वस्त्र वा तत्सम आसन घेतल्यास त्यांच्या सभोवती रांगोळी काढावी. बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देव यांना प्रार्थना करावी, `आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे.'

१ ए. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची अन् स्वत:ची शुद्धी : कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. `पुंडरीकाक्षाय नम: ।' हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजासाहित्यावर, आजूबाजूला आणि स्वत:च्या शरिरावर शिंपडावे. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हनात सोडावे.

२. पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना
२ अ. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पीतांबर किंवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे.
२ आ. पूजा करतांना देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाली आहे, आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा देवता स्वीकारत आहे', असा भाव मनात ठेवावा अन् प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा.
२ इ. आदल्या दिवशी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार (निर्माल्य) काढून त्याचे विसर्जन करावे.
२ ई. ज्यांना पूजेतील श्लोक/मंत्र म्हणता येणार नाहीत, त्यांनी केवळ `आवाहयामि, समर्पयामि' असा उल्लेख असलेले नाममंत्र म्हणून देवतेला उपचार समर्पित करावे, उदा. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

३. श्री गणेशाची षोडशोपचारपूजा
।। अथ पूजा प्रारंभ ।।
कुंकूमतिलक : पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वत:ला कुंकूमतिलक लावावा.
आचमन : उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी `नम:' हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे. १. श्री केशवाय नम: । २. श्री नारायणाय नम: । ३. श्री माधवाय नम: । चौथे नाव उच्चारतांना `नम:' या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. ४. श्री गोविंदाय नम: । पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत. ५. श्री विष्णवे नम: । ६. श्री मधुसूदनाय नम: । ७. श्री त्रिविक्रमाय नम: । ८. श्री वामनाय नम: । ९. श्री श्रीधराय नम: । १०. श्री हृषीकेशाय नम: । ११. श्री पद्मनाभाय नम: । १२. श्री दामोदराय नम: । १३. श्री संकर्षणाय नम: । १४. श्री वासुदेवाय नम: । १५. श्री प्रद्मुम्नाय नम: । १६. श्री अनिरुद्धाय नम: । १७. श्री पुरुषोत्तमाय नम: । १८. श्री अधोक्षजाय नम: । १९. श्री नारसिंहाय नम: । २०. श्री अच्युताय नम: । २१. श्री जनार्दनाय नम: । २२. श्री उपेंद्राय नम: । २३. श्री हरये नम: । २४. श्री श्रीकृष्णाय नम: ।। पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.

देवतास्मरण : श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: । अविघ्नमस्तु ।।

देशकाल : पूजकाने स्वत:च्या दोन्ही डोळयांना पाणी लावून पुढील `देशकाल' म्हणावा. श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा. ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा. `तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ।। संकल्प : उजव्या हातात अक्षता घेऊन संकल्प म्हणावा.



श्री महागणपतिपूजन : प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार (जागेनुसार) ताह्मण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदूळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.

ध्यान : नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे आणि पुढील श्लोक म्हणावा. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

अर्थ : वाईट मार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, प्रचंड शरीर असलेल्या, कोटी सूर्यांचे तेज सामावलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यांतील विघ्ने सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो. श्री महागणपतये नम: । ध्यायामि ।।

आवाहन : उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.) `श्रीमहागणपतये नम: । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्‍तिकं आवाहयामि ।।'

आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महागणपतीच्या चरणी वहाव्यात. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।। चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) घेऊन देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना `समर्पयामि' हा शब्द उच्चारतांना कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत. श्री महागणपतये नम: । चंदनं समर्पयामि ।। (गंध लावावे.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । हरिद्रां समर्पयामि ।। (हळद वहावी.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । कुंकुमं समर्पयामि ।। (कुंकू वहावे.) श्री महागणपतये नम: । ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.) श्री महागणपतये नम: । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.) श्री महागणपतये नम: । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे.) श्री महागणपतये नम: । दूर्वांकुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.) श्री महागणपतये नम: । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.) श्री महागणपतये नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.) उजव्या हातात दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावे. प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' अशा प्रकारे म्हणतात.) हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि उर्वरित दूर्वाश्री गणपतीच्या चरणी वहाव्यात. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे. श्रीमहागणपतये नम: । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। (गंध-फूल वहावे.) करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।

अर्थ : हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने. यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि `प्रीयताम्' हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे. अनेन कृतपूजनेन श्री महागणपति: प्रीयताम् ।

श्रीविष्णुस्मरण : दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे. नंतर ९ वेळा `विष्णवे नमो' म्हणावे अन् शेवटी `विष्णवे नम: ।' असे म्हणावे.

कलशपूजन गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि ।। कलशदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।। कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.

शंखपूजा शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।। अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो.

घंटापूजा आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।। अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध-फूल समर्पित करतो. घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

दीपपूजा भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळदी-कुंकू वहाण्याची पद्धतही आहे.)
मंडपपूजन (माटोळीपूजन) : पुढील मंत्र म्हणतांना `समर्पयामि' या शब्दाच्या वेळी मंडपावर (माटोळीवर) गंध, अक्षता आणि फूल वहावे. मंडपदेवताभ्यो नम: । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
स्थलशुद्धी अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।।
अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो. पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.

पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा
प्राणप्रतिष्ठा : पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे', असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत. अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्‍तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्‍ति: क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य प्राणा इह प्राणा: ।।ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य जीव इह स्थित: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
(टीप - प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्‍त आहेत.) अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।। नंतर `परमात्मने नम: ।' असे १५ वेळा म्हणावे.

ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.

(टीप - हा मंत्र वेदोक्‍त आहे. ) एकदंतं शूर्पकर्णं गजवक्‍त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । ध्यायामि ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत, अशा प्रकारे हातांमध्ये अंकुश आणि पाश धारण करणार्‍या भगवान सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.
१.आवाहन : उजव्या हातात अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.) आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्‍वर । अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आवाहयामि ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या, अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.

२. आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना देवांच्या चरणी वहा. विचित्ररत्‍नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् । स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।।

३. पाद्य : उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. सर्वतीर्थसमुद्‌भूतं पाद्यं गंधादिभिर्युतम् । विघ्नराज गृहाणेदंभगवन्भक्‍तवत्सल ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पाद्यं समर्पयामि ।।

४. अर्घ्य : डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. अर्घ्यं च फलसंयुक्‍तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । अर्घ्यं समर्पयामि ।।

५.आचमन : डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् । गंगोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आचमनीयं समर्पयामि ।।

६. स्नान : पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. गंगासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलै: । स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानं समर्पयामि ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.
६ अ. पंचामृत स्नान : पुढीलप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पयस्नानं समर्पयामि । तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दधिस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । मधुस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
६ आ. अभिषेक : पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना श्रीगणपतिअथर्वशीर्ष किंवा संकटनाशनगणपति स्तोत्र म्हणावे.

७.वस्त्र : कापसाची वस्त्रे घ्या अन् `समर्पयामि' म्हणतांना ती देवतांच्या चरणी वहा. रक्‍तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् । सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्‍या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।

८. यज्ञोपवीत : महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात. राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनस्योत्तरीयकम् । विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपवीताचा तू स्वीकार कर. उमायै नम: । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

९. चंदन : देवांना अनामिकेने गंध लावावे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् । उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्‍या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर. श्री उमायै नम: । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।। (हळद-कुंकू वहावे.) श्री उमायै नम: । श्रीसिद्धिविनायकाय नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)

१०. फुले-पत्री : उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावी.


अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले आपण घ्यावी. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, उंडीणकमळे, पुंनाग, जाई, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्‍वरा, तू प्रसन्न हो. महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे. श्रीउमामहेश्‍वराभ्यां नम: । तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।
अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात. श्री गणेशाय नम: । पादौ पूजयामि ।। (चरणांवर) श्री विघ्नराजाय नम: । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर) श्री आखुवाहनाय नम: । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर) श्री हेरंबाय नम: । कटिं पूजयामि ।। (कमरेवर) श्री कामारिसूनवे नम: । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर) श्री लंबोदराय नम: । उदरं पूजयामि ।। (पोटावर) श्री गौरीसुताय नम: । हृदयं पूजयामि ।। (छातीवर) श्री स्थूलकंठाय नम: । कंठं पूजयामि ।। (गळयावर) श्री स्कंदाग्रजाय नम: । स्कंधौ पूजयामि ।। (खांद्यांवर) श्री पाशहस्ताय नम: । हस्तौ पूजयामि ।। (हातावर) श्री गजवक्‍त्राय नम: । वक्‍त्रं पूजयामि ।। (मुखावर) श्री विघ्नहर्त्रे नम: । नेत्रे पूजयामि ।। (डोळयांवर) श्री सर्वेश्‍वराय नम: । शिर: पूजयामि ।। (मस्तकावर) श्री गणाधिपाय नम: । सर्वांगं पूजयामि ।। (सर्वांगावर) पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून `समर्पयामि' असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. श्री सुमुखाय नम: । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान) श्री गणाधिपाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।। (माका) श्री उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल) श्री गजाननाय नम: । श्‍वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा) श्री लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर) श्री हरसूनवे नम: । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा) श्री गजकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस) श्री गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा) श्री वक्रतुंडाय नम: । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी) श्री एकदंताय नम: । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा) श्री विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर) श्री विनायकाय नम: । अश्मंतकपत्रं समर्पयामि ।। (आपटा) श्री कपिलाय नम: । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई) श्री भिन्नदंताय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा) श्री पत्‍नीयुताय नम: । विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण) श्री बटवेनम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब) श्री सुरेशाय नम: । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार) श्री भालचंद्राय नम: । मरूबकपत्रं समर्पयामि ।। (मरवा) श्री हेरंबाय नम: । सिंदुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड) श्री शूर्पकर्णाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई) श्री सर्वेश्‍वराय नम: । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति) यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे म्हणून एकेक दूर्वा अर्पण करावी.

११. धूप : उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्‌भूतो गंधाढ्यो गंध उत्तम: । आघ्रेय: सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्‍त असलेला, सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । धूपं समर्पयामि ।।

१२. दीप
आज्यं च वर्तिसंयुक्‍तं वह्िनना योजितं मया । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।। भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

१३. नैवेद्य : उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा. नैवेद्यं गृह्यतां देव भक्‍तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्‍ती अचल करावी. या लोकांत माझे अभीष्ट, ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्‍त व्हावी. खडीसाखर आदि खाद्यपदार्थ दही, दूध, तूप आदि भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।। प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ।' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' असे म्हणण्यात येते.) पूजकाने हातातील दूर्वा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहाव्या आणि उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे. नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। फुलाला गंध लावून देवाला वहावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। यानंतर आरती करून कापूरारती करावी.

पाठभेद : शास्त्रात आरतीनंतर `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.

१४. नमस्कार : नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा. नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृत: ।। नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।। सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्‍वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या, सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या, सहस्र नावे असलेल्या, सहस्रकोटी युगांना धारण करणार्‍या, शाश्‍वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. प्रदक्षिणा : नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वत:च्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी. यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् । तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्‍वर ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे, मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ।। दूर्वायुग्मसमर्पण
(पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.) दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावांनी दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नम: । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर `दूर्वायुग्मं समर्पयामि ।' असे म्हणावे. श्री गणाधिपाय नम: । श्री उमापुत्राय नम: । श्री अघनाशनाय नम: । श्री एकदंताय नम: । श्री इभवक्‍त्राय नम: । श्री मूषकवाहनाय नम: । श्री विनायकाय नम: । श्री ईशपुत्राय नम: । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: । श्री कुमारगुरवे नम: ।। नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी. गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदंतेभवक्‍त्रेति तथा मूषकवाहन ।। विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्‍नत: ।। श्री सिद्धिविनायकाय नम: । दूर्वामेकां समर्पयामि ।।

१६. मंत्रपुष्प आणि प्रार्थना
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धीने काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी. अनेन देशकालाद्यनुसारत: कृतपूजनेन उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवता प्रीयताम् ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडणे.) प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
पाठभेद : शास्त्रात `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.
मोदक वायनदान मंत्र : पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे. विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् । विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।। यानंतर आचमन करून `विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ।' असे म्हणावे.
मूर्तीविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा.यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे. श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणेश पूजाविधी')

 

 


गणेश जयंतीविषयी ईश्‍वराकडून मिळालेले ज्ञान

ईश्‍वराने सनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांच्या माध्यामातून गणेश जयंतीविषयी दिलेले माहिती येथे देत आहोत.

ब्रह्माहांडाच्या निर्मितीच्या वेळी गणेशतत्त्व निर्गुणात असणे

ब्रह्माहांडाच्या निर्मितीच्या वेळी गणेशतत्त्व निर्गुणात होते व ते अक्रियाशील होते. त्या वेळी प्रजापति, ब्रम्हा, विष्णु, महेश व मिनाक्षी ही पंचतत्त्वे कार्यरत होती.

गणेशतत्त्वाची उत्पति व गणेश जयंती
गणेश जयंतीच्या दिवशी प्रथम शिवातील निर्गुणतत्त्वातील १० टक्के निर्गुण-सगुण तत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. यामध्ये मीनाक्षीतील(श्री दुर्गादेवी) २० टक्के तत्त्व जागृत होऊन सगुण-निर्गुण तत्त्वात क्रियाशील झाले. शिवाच्या निर्गुण-सगुण तत्त्वाचे व मीनाक्षी सगुण-निर्गुण तत्त्वाचे मीलन झाले. या तत्त्वांच्या मीलनामुळे नवीन तत्त्वाची उत्पत्ति झाली. हे नवे तत्त्व म्हणजे `गणेशतत्त्व.' या दिवशी गणेशतत्त्व सगुणातून अस्तित्वात आल्यामुळे या दिवसाला `गणेश जयंती', असे म्हणतात.

गणेशपुराणात याला अनुसरून एक प्रसंग आहे. यामध्ये पार्वतीने तिच्या मळापासून गणपतीची निर्मिति केल्याचा उल्लेख आहे. `गणपति हा पार्वतीचा (मातेचा) पुत्र आहे', असे जरी म्हणत असले, तरीही त्याच्यात ७० (६०*) टक्के शिवतत्त्व आहे; कारण पार्वतीमध्ये ७० (५०*) टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात शिवतत्त्व आहे.

* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

गणेश जयंतीच्या दिवशी

अ. ब्रह्मांडात होणारा परिणाम

गणेश जयंतीच्या दिवशी संपूर्ण वायुमंडल व ब्रह्मांड गणेशतत्त्वाने भारीत होते. सकाळी ११.५७ वाजेपर्यंत ब्रह्मांडाची ७० (६०*) टक्के सुषुम्ना नाडी व ३० (४०*) टक्के सूर्यनाडी सुरू असते. त्यामुळे सर्व लोकांत गणेशतत्त्वाबरोबरच सात्त्विकता व चैतन्य खूप मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपित होत असते.  अनेक गणेशभक्‍तांनी याच दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला आहे.
* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

आ. गणेशलोकातील वातावरण
या दिवशी गणेशलोकात उत्साहाचे वातावरण असते. पार्वती, शिवगण, इतर देवता व ऋषीमुनी गणेशलोकात जातात. या दिवशी कार्तिकेयही गणेशलोकात आलेला असतो. गणपति रिद्धि-सिद्धि यांच्यासमवेत सिंहासनावर विराजमान झालेला असतो. (या माहितीचे टंकलेखन करतांना मला गणेशलोक व सिंहासनावर बसलेला गणपति यांचे दर्शन
झाले. - कु. मधुरा) पार्वती गणपतीचे औक्षण करते. सर्व देवता गणपतीवर पुष्पवृष्टि करतात. गणपतीसह सर्वजण मोदकाचा नैवेद्य ग्रहण करतात.

इ. चैतन्य, आनंद व शांति यांचे नेहमीपेक्षा जास्त प्रक्षेपण होणे
सर्वांच्या उपस्थितीमुळे गणेशलोकातील वातावरण अतिशय आनंदमय होते. गणेशलोक
लालसर-पिवळया रंगाचा दिसतो. या दिवशी चैतन्य व आनंद यांचे नेहमीपेक्षा ५० (४०*) टक्के जास्त प्रक्षेपण होत असते, तर शांतीचे ३० (२०*) टक्के जास्त प्रक्षेपण होत असते.
* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

ई. गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या वस्तूंवर होणारा परिणाम
या दिवशी मोदक, जास्वंद, दुर्वा या गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या वस्तू ५० (२०*) टक्के जास्त गणेशतत्त्व आकृष्ट करतात. इतर दिवसांच्या तुलनेत त्यांच्याकडून ३० (१०*) टक्के चैतन्य व ३० (२०*) टक्के गणेशतत्त्व जास्त प्रक्षेपित होत असते.
* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

उ. शिवाने गणपतीचा शिरच्छेद करणे, म्हणजे अजागृत गणेशतत्त्वाचे कार्य थांबवून गणेशतत्त्व जागृत करणे
गणेश जयंतीनंतर गणेशतत्त्व ब्रह्मांडात सगुण-निर्गुण तत्त्वाच्या रूपाने कार्यरत झाले, तरीही ते केवळ १० (५*) टक्के इतकेच जागृत होऊन कार्य करत होते. गणेशपुराणात `शिवाने बालगणपतीचा शिरच्छेद केला व त्याला हत्तीचे मस्तक लावले', असा उल्लेख आढळतो. याचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे. बालगणपति हे अजागृत व अक्रियाशील गणेशतत्त्वाचे निदर्शक आहे. शिवाने त्रिशूळाने गणपतीचा शिरच्छेद करणे, म्हणजे अजागृत गणेशतत्त्वाचे कार्य थांबवून गणेशतत्त्व जागृत करणे. गणपतीला नवीन (हत्तीचे) मुख लावणे व त्याच्या मूळ स्वरूपात बदल होणे, म्हणजे गणपतीच्या निर्गुणरूपाचे जागृत-कार्यरत सगुण-निर्गुण रूपात परिवर्तन होणे. त्यानंतर गणेशतत्त्व पूर्णपणे जागृत झाले व संपूर्ण ब्रह्मांडात कार्यरत झाले. गणेशतत्त्व जागृत झाल्यामुळेच तारकासुर, सिंधुरासुर व दुर्वासुर यांसारख्या असुरांचा नाश झाला.
* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

गणेशजयंतीला गणेशतत्त्वाचा फायदा होण्यासाठी करावयाची उपासना

या दिवशी गणपतीचा भावपूर्ण तारक किंवा मारक किंवा संयुक्‍त नामजप ३ ते ९ माळा करण्याचा प्रयत्‍न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्‍ति व चैतन्य यांचा जास्त फायदा होतो. गणपति अथर्वशीर्ष म्हटल्यासही फायदा होतो.

अ. गणेशजयंतीला नामजप करणे, पूजन व आरती करणे व अथर्वशीर्ष म्हणणे यांचा होणारा तुलनात्मक फायदा

* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

गणेश जयंतीच्या दिवशी वरील तिन्ही प्रकारे साधना केल्यास साधकाला गणेशतत्त्वाचा १०० टक्के लाभ होतो. - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.२.२००५, दुपारी १२.०७)

गणेशलोक

अ. वैशिष्ट्य :
गणेशलोकामध्ये लालसर रंगाचा प्रकाश असतो. तसेच तेथील वातावरण उत्साही व मनाला आनंद देणारे असते.

मृत्यूनंतर गणेशलोकात स्थान मिळण्यासाठी गणेशभक्‍तात आवश्यक असलेले गुण

अ. मुमुक्षुत्व : गणेशभक्‍ताला ईश्‍वरप्राप्‍तीची तीका तळमळ असणे आवश्यक आहे. तरच तो गणेशलोकात गणपतीला अपेक्षित अशी साधना करू शकेल.
आ. सात्त्विकता व चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता असलेला : गणेशलोकातील सात्त्विक व पवित्र वातावरणाचा आणि गणपतीच्या अस्तित्वाचा जास्तीतजास्त लाभ करून घेण्यासाठी गणेश भक्‍ताची सात्त्विकता आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता चांगली असणे आवश्यक आहे.
इ. जिज्ञासा : ज्या भक्‍तांमध्ये `साधना चांगली होण्यासाठी काय करावे', अशी तळमळ असते व साधना आणि अध्यात्म यांबाबत जिज्ञासा असते, त्यांना गणपति वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो.
ई. तळमळ : गणपति प्रकाश व नाद या भाषांद्वारे वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन करतो आणि ज्ञानही देतो. हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी भक्‍ताची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता चांगली असायला हवी. भक्‍तात तळमळ असेल, तरच त्याला हे ज्ञान मिळते.
- ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.२.२००५, दुपारी १२.०७)

 

 

गणेश मंत्रांचे महत्त्व

साधनामंत्र

अ. `श्री गणेशाय नम: ।' यातील श्री हा श्रीं आहे व तो बीजमंत्र आहे. गणेशाय ही मूळ बीजाची संकल्पना आहे, तर
नम: हे पल्लव आहे.

आ. `ॐ गँ गणपतये नम: ।'
अर्थ : ॐ म्हणजे प्रणव, गँ म्हणजे मूळ बीजमंत्र, गणपतये म्हणजे आकृतिबंधाला व नम: म्हणजे नमस्कार करतो.

बीजमंत्र
`गँ' हा गणपतीचा मूळ बीजमंत्र आहे. गणपतीची, म्हणजे पंचमहाभूतांतील तेजप्रवाहांची, उत्पत्ति ज्या तेजसमूहापासून झाली, तो तेजसमूह `गँ' या बीजमंत्रात अंतर्भूत आहे. `गँ'चा उच्चार *, ञ, ण, न, म, या पाच अनुनासिकांना एकत्र करून जो उच्चार होईल, त्याप्रमाणे असतो. मंदाराच्या, म्हणजे पांढर्‍या रुईच्या झाडापुढे `गँ' ची आवर्तने केल्यास त्या झाडाची एक मुळी वर येते. तिला गणेशाचा आकार असतो. त्याचे कारण याप्रमाणे आहे - `गँ' च्या उच्चाराने त्याची स्पंदने (शक्‍ति) वातावरणात निर्माण होतात. त्यांचा झाडाच्या मुळावर परिणाम होतो आणि `शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व त्यांच्याशी संबंधित शक्‍ति एकत्र असतात', या नियमानुसार शक्‍तीबरोबर गणेशाच्या रूपाची मुळी वर येते. सात-आठ वर्षांहून जास्त वयाच्या पांढर्‍या रुईच्या वृक्षाला जमिनीतून मुळासकट बाहेर काढले असता त्याच्या मुळाचा आकार गणपतीप्रमाणे दिसतो.

अंगारकयोग (मंगळवारी संकष्टी चतुर्थी) किंवा रविवारी पुष्य नक्षत्र असेल तेव्हा सात-आठ वर्षांहून जास्त वयाच्या वृक्षाची षोडशोपचारे पूजा करून अथर्वशीर्षाचा पाठ करावा. साधारणत: चतुर्थीपासून सुरू करून दुसर्‍या चतुर्थीपर्यंत एक हजार पाठ करावे. नंतर हवन करून प्रत्येकी शंभर मोदक, लाह्या व दूर्वाकुरांची आहुति द्यावी. शेवटी कुणाशी न बोलता व कुणालाही स्पर्श न करता ते झाड मुळापासून उपटून काढावे. त्याचा आकार गणपतीसारखाच असतो. ही संस्कारित मूर्ति घरी स्थापन करावी. ह्या मूर्तीच्या पूजनाने अनेक प्रकारच्या सिद्धी तसेच ऐश्वर्य प्राप्‍त होते. मूर्तीची दररोज धूप, दीप व नैवेद्य यांसह पूजा करून अथर्वशीर्षाचा पाठ म्हणावा. शक्‍ति संक्रमित होऊन नाहीशी होऊ नये म्हणून बहुधा अशी मूर्ति झाकून ठेवतात.

खार्‍या पाण्यातील गारगोटीवर `गँ' मंत्राचा कमीतकमी वर्षभर उच्चार केल्यास गारगोटीचा आकार गणपतीसारखा होतो. मोरया गोसावींनी असे बरेच गणपती बनविले होते.

 


 कार्याच्या अनुषंगाने गणपतीची विविध रूपे

कु. मधुरा भोसले

ईश्‍वराने कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून गणपतीच्या विविध रूपांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

अ. तारक रूपाचे कार्य करतांना
तारकतत्त्वाचे कार्य करतांना गणपति पाटावर बसलेला दिसतो. तेव्हा त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हातामधून ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात क्रियाशील तारक (गणेश) शक्‍ति प्रक्षेपित होत असते.

आ. मारक रूपाचे कार्य करतांना
मारक रूपाचे कार्य करतांना गणपति कधी उंदरावर आरूढ असतो, तर कधी वाघ, सिंह व अश्व या वाहनांवर आरूढ असतो. पाश व अंकुश यांच्या बरोबरच त्रिशूळ, भाला यांसारख्या आयुधांचा व विविध अस्त्रांचाही वापर करतो. त्या वेळी गणपति त्वेषाने लढत असतो व त्याच्याकडून संपूर्ण ब्रह्मांडात खूप प्रमाणात मारक शक्‍ति प्रक्षेपित होत असते.

इ. तारक-मारक संयुक्‍त कार्य करतांना
गणपतीला एकाच वेळी आवश्यकतेनुसार तारक व मारक अशा दोन्ही स्वरूपांचे कार्य करावे लागते. तेव्हा त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हातातून तारक शक्‍ति प्रक्षेपित होत असते व शस्त्र धारण केलेल्या हातातून खूप प्रमाणात मारक शक्‍ति प्रक्षेपित होतांना जाणवते. शस्त्रांमधील शक्‍ति ३० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत होते. त्या वेळी गणपतीकडून पाश व अंकुश यांचा प्रामुख्याने वापर होतो.

ई. मुनी वेशातील गणपति
शिव व पार्वती यांची उपासना करतांना गणपति मुनीच्या (तपस्वीच्या) वेशात दिसतो.

उ. सिंहासनावर रिद्धि-सिद्धि यांच्याबरोबर बसलेला गणपति
गणेशलोकातील महालात काही वेळा गणपति रिद्धि-सिद्धि यांच्याबरोबर सिंहासनावर विराजमान झालेला दिसतो. त्या वेळी तो वरील सर्व कार्ये एकाच वेळी सूक्ष्मातून आवश्यकतेप्रमाणे करत असतो. याबरोबरच गणेशभक्‍तांना मार्गदर्शन करण्याचे, त्यांना ज्ञान व सिद्धि प्रदान करण्याचे कार्य प्रामुख्याने करत असतो.

जेव्हा रिद्धि गणपतीच्या डाव्या व सिद्धि उजव्या बाजूला असते, तेव्हा गणपतीची सूर्यनाडी सुरू असते. जेव्हा रिद्धि उजव्या बाजूला व सिद्धि डाव्या बाजूला असते, तेव्हा त्याची चंद्रनाडी जागृत असते. पाटावर बसलेल्या गणपतीची जास्त प्रमाणात सुषुम्नानाडी जागृत असते. मारक रूपाचे कार्य करतांना आवश्यकतेप्रमाणे सूर्यनाडी सुरू होते. - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.२.२००५, दुपारी १२.०७)

 


गणपतीचे वाहन

वृ-वह म्हणजे वहाणे यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत.

आवाहन म्हणजे आवाहन. आवाहन केल्याशिवाय, म्हणजे निमंत्रणाशिवाय, देवही येत नाहीत. (मात्र भक्‍त संकटात असला, तर आवाहनाशिवायही देव लगेच धावून येतो.) आवाहन केले असता ज्या कार्यासाठी जायचे त्यासाठी पूरक वाहन आवश्यक असते, उदा. युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे वाहन मोर आहे. खालील कोष्टकात युगानुसार गणपतीचे वाहन व गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य यांची माहिती दिली आहे.

 

शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात ?

गणपति हा दिशांचा अधिपति आहे. गणेशपूजन केल्यामुळे दिशा मोकळया करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती पूजास्थानी येऊ शकते.

गणपति (नाद) भाषेचे देवांच्या (प्रकाश) भाषेत रूपांतर करतो, त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवांना कळतात. गणपति विघ्नहर्ता आहे. (संदर्भ : सनातन संस्थेचे प्रकाशन `गणपति')

 विविध देवतांविषयीची (उदा. कृष्णाचे मोरपीस, भूमिकन्या सीता इत्यादींचा भावार्थ, शनि व मारुति यांचा संबंध), अध्यात्माच्या विविध अंगांनी व साधना कोणती करावी याची माहिती सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या अध्यात्मशास्त्रविषयक ग्रंथेंमध्ये व ध्वनिफीतींमध्ये दिली आहे. तसेच देवतांची सात्त्विक चित्रेही उपलब्ध आहेत.


सनातनने प्रकाशित केलेले गणपतीचे सात्त्विक चित्र

 

श्रीगणेशाशी संबंधित साधकांना आलेल्या अनुभूती

श्रीगणेशाच्या चित्राकडे पहात नामजप केल्याने त्याच्या वरदहस्तातून शक्‍ति, चैतन्य व तेज बाहेर पडत असल्याचे जाणवणे
मी नामजप करतांना नेहमी श्रीगणेशाचे चित्र माझ्या डोळयांसमोर ठेवते. नामजप करतांना माझे लक्ष नामजपावर केंद्रित होण्यासाठी मी श्रीगणेशाच्या वेगवेगळया अवयवांकडे व शस्त्रांकडे पाहून नामजप करते. त्या वेळी `श्रीगणेशाच्या आशीर्वाद देणार्‍या हातातून प्रचंड शक्‍ति, चैतन्य व तेज बाहेर पडत आहे', असे मला जाणवते. त्या तेज:पुंज हाताकडे पाहून माझा श्‍वास एका लयीत सुरू होऊन मला खूप हलके वाटते. काही वेळा चित्राकडे पहात असतांना माझे ध्यान लागते. - कु. सुवर्णा कुंभार, देवद आश्रम (२८.९.२००४)

प्राणप्रतिष्ठेपूर्वी चांगली न दिसणारी मूर्ति प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर चैतन्यमय व सुंदर दिसणे
गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आमच्या जवळच असलेले एक मूर्तिकार श्री. रसाळ यांनी साधकांसाठी शास्त्रानुसार २५ मूर्ती बनवल्या होत्या. मी ज्या वेळी त्यांच्याकडे मूर्ति आणण्यासाठी गेले, त्या वेळी बर्‍याच साधकांनी आपापली मूर्ति नेली होती. त्यामुळे मी गेले तेव्हा फक्‍त दोनच मूर्ती शिल्लक होत्या. त्या मूर्ती सफाईदारपणे बनवलेल्या दिसत नव्हत्या. त्यामुळे `त्या दोन मूर्तीपैंकी मूर्ति घेऊ नये', असे मला व माझ्या घरातील व्यक्‍तींना वाटत होते; परंतु आम्हाला शास्त्रानुसारच मूर्ति हवी असल्याने आम्ही त्यातील एक मूर्ति घेतली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत आम्ही ती झाकून ठेवली होती. गणेशचतुर्थीच्या दिवशी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आम्हाला त्या मूर्तीमध्ये खूपच चैतन्य जाणवले व ती खूप सुंदर दिसत होती. - सौ. निलीमा कुलकर्णी, निफाड, नाशिक.

गणेशोत्सवात आयोजित केलेल्या प्रवचनात विविध अडथळे येणे व सर्व साधकांनी श्रीगणेशाच्या नामजपाने त्यावर मात करणे
२१.९.२००४ रोजी येरागड्डा, हैद्राबाद येथे लक्ष्मीनिवास गणेशोत्सव मंडळातर्फे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. `श्रीगणेशाच्या पूजनाचे शास्त्र', या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. त्या वेळी प्रवचनाच्या पूर्वी दोन तास प्रवचन घेणार्‍या साधकाची प्रकृति अचानक बिघडली. प्रवचनाच्या सुरुवातीला संस्थेची माहिती सांगतांना वीज गेली. त्या वेळी उपस्थित सर्व साधकांनी ``ॐ गँ गणपतये नम: ।' हा नामजप केल्यानंतर काही क्षणांतच वीज आली. त्यानंतर प्रवचनात कोणतेही अडथळे आले नाहीत. - श्री. प्रवीण रेडकर, हैद्राबाद

 


गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या काही रांगोळया

पाटावर किंवा चौरंगाच्या खाली रांगोळी काढण्याचे व तिच्यावर हळदकुंकू वाहण्याचे महत्त्व
कुठलाही पूजाविधि करतांना प्रथम पाटावर किंवा चौरंगाच्या खाली सात्त्विक आकाराची रांगोळी काढल्याने या आकारातून प्रक्षेपित होणार्‍या गतिमान लहरींचे पाटाभोवती व चौरंगाभोवती कवच बनण्यास मदत होते. रांगोळीतून प्रक्षेपित होणार्‍या गतिमान लहरींकडे व रांगोळीच्या आकृतीमध्ये भूमिलहरी आकृष्ट होऊन त्याही तिथे बांधल्या जातात. यामुळे रांगोळीच्या रेखाटनातून आवश्यकतेप्रमाणे सात्त्विक लहरींचे जीवाकडे प्रक्षेपण होते, तसेच या लहरींचे भूमीवर सूक्ष्म-आच्छादन तयार होण्यास मदत झाल्याने पाताळातून किंवा वास्तूतील वाईट शक्‍तींकडून प्रक्षेपित होणार्‍या काळया लहरींपासून जीवाचे रक्षण होण्यास मदत होते. रांगोळीच्या वेगवेगळया आकृतीप्रमाणे त्या त्या आकृतीत साठवल्या गेलेल्या विशिष्ट देवतांच्या लहरींमुळे वाईट शक्‍तीही रांगोळीला बघून घाबरतात. म्हणून कोणत्याही शुभविधीत वाईट शक्‍तींचा अडथळा येऊ नये, यासाठी दारासमोर किंवा पूजाविधीसमोर किंवा पाटाच्या खाली रांगोळी काढतात. रांगोळी काढल्यानंतर रांगोळीच्या केंद्रबिंदूवर हळदकुंकू वाहतात. यामुळे हळद-कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वाशी संबंधित रंगकणांकडे ब्रह्मांडातील उच्च देवतांच्या लहरी पटकन आकर्षिल्या जातात.
त्यामुळे रांगोळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींची कार्यक्षमता, गतिमानता व परिणामकारकताही वाढते. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून २१.११.२००४, सायं. ६.३७)

प.पू. डॉक्टर : सात्त्विकता वाढवणार्‍या काही रांगोळया हव्यात.
एक विद्वान : कमीतकमी रेषांनी बनणार्‍या, तसेच सरळ व गोलाईयुक्‍त रेषांनी बनणार्‍या रांगोळया या सात्त्विक असतात; कारण गोलाईयुक्‍त आकारांतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमध्ये निर्गुणाचे प्रमाण जास्त असते व या रेषेंमध्ये प्रवाहीपणाही जास्त असल्याने यांची कार्यक्षमताही व वातावरणात टिकणारा सात्त्विकतेचा परिणामही जास्त असतो.

गणेशाच्या तारक रूपाशी संबंधित रांगोळया


   

प.पू. डॉक्टर : वाईट शक्‍तींना रोखणार्‍या काही रांगोळया हव्यात.
एक विद्वान : देवतांच्या आयुधांची रेखाटने, तसेच तिरक्या रेषांचा व चौकोनांचा, त्रिकोणांचा उपयोग करून काढलेल्या आकृतीबंधातून मारक तिर्यक लहरी प्रक्षेपित करण्याची क्षमता जास्त असल्याने या लहरींमुळे वातावरणातील रज-तम कणांचे घर्षण होऊन या रज-तमकणांसहित असलेल्या काळया शक्‍तीचे विघटन होते.

गणेशाच्या मारक रूपाशी संबंधित रांगोळया

  
  
 

 


कलाकारांनो, गणपतीचे विडंबन म्हणजे कलात्मकता नव्हे!

संकलन : सौ. रूपाली वर्तक, पनवेल

``ओ मार्व्हलस ! पेंटिंग्ज''
``सो ब्युटिफूल वे लॉर्ड गणेश दे हॅव शोन !''
``हाऊ स्वीट दे बेबी गणेश आर !''
हे संवाद कानावर पडले एका प्रसिद्ध सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका राज्यातील काही कलाकरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले होते. बाहेर झुंबड उडाली होती. काहीशा गडबड गोंधळात आणि उडत्या संगीताच्या सुरावर आम्ही त्या सभागृहात प्रवेश केला. जिकडे नजर जाईल तिकडे असंख्य रंगीबेरंगी, विविध आकाराच्या आणि प्रकाराच्या वस्तूंनी तेथील प्रत्येक छोटे दुकान ओसंडून वहात होते. पहिल्याच स्टॉलकडे गेलो. तेथे गणपतीच्या आकाराच्या छोट्या-मोठ्या पिशव्या अडकवल्या होत्या. त्यांच्यापैकी काहींना सोंड होती, तर काहींना भले मोठे कान ! ते पाहून कसेसेच वाटले. पुढे गेलो तर एका प्रसिद्ध चित्रकाराची किमती चित्र तेथे लटकवलेली होती. त्यात श्री गणेशासारखा चेहरा असणारी विविध व्यवसायातील माणसे चितारली होती. म्हणे ती आपल्या घरी लावून आम्ही कलाप्रेम सिद्ध करू शकणार होतो ! काहीशा विषण्ण मन:स्थितीत पुढच्या स्टॉलला गेलो. तिथे असंख्य घड्याळे आणि विविध आकाराचे दिवे ठेवलेले होते. प्रत्येक घड्याळा